पुणे,
दि. २१ - राज्यात बहुतांश पिकाच्या पेरण्या पुर्ण झालेल्या आहेत. आतापर्यंत कापुस पिकाखाली 38.75 लाख हे. क्षेत्रावर लागवड पुर्ण झालेली आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसातील खंडामुळे आणि जामदार कायिक वाढीमुळे कापुस पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रस शोषणा-या किडींचा प्रार्दुभाव दिसुन येत आहे.
कृषि विभागामार्फत राज्यात कापुस पिकावरील किड व रोग सर्वेक्षणासाठी "क्रॉपसॅप" योजना राबविली जात आहे. या योजने अंतर्गत कापुस उत्पादक गावामध्ये निवडक प्लॉट निवडुन त्याचे दर आठवडयास सर्वेक्षण करण्यात येते. त्या आधारे कृषि विद्यापिठाच्या तज्ञांकडून किड व रोग नियंत्रणासाठी योग्य तो सल्ला सर्व शेतक-यापर्यत पोहचविण्यात येत आहे. कॉपसॅपच्या दि. 27.07.2018
च्या अहवालानुसार राज्यात 925 गावांमध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रस शोषणा-या किडीचा प्रार्दुभाव नुकसान पातळीवर पुढे जात असल्याचे निदर्शनास येत आहे. हीच परिस्थिती सर्वेक्षण न झालेल्या इतर गावातही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या रसशोषण किडीच्या प्रार्दुभावासंदर्भात पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तसेच केंद्रीय कापुस संशोधन केंद्र, नागपुर येथील तज्ञांशी चर्चा केलेली असता कापुस पिकावर वाढ संजिवके, हार्मोन्स, टॉनिक यासारख्या केवळ कायिक वाढीस पोषक ठरुन पिकास लुसलुशीतपणा वाढतो. पिकाच्या हिरवेपणात वाढ झाल्याने शेतक-यांना याच्या प्रभावा बद्दल समाधानकारक चित्र निर्माण होते. परंतु पिकातील ही अनावश्यक कायिक वाढ व लुसलुशीतपणा, मावा, तुडतुडे , फुलकिडे यासारख्या रस शोषक किडींना पोषक ठरतो आणि या रसशोषक किडीचा प्रार्दुभाव वाढतो. परिणामी, शेतक-यांना याकिडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांच्या फवारणीवरील खर्च वाढतो. अशा वाढ संप्रेरकाच्या प्रत्यक्ष पिक उत्पादन वाढीसाठी नेमका किती परिणाम होतो. याबाबत ठोस निष्कर्ष नाहीत अथवा तशा प्रकारच्या शिफारसी देखील अदयापही कृषि विद्यापिठे व संशोधन केंद्रांनी केलेली नाहीत. त्याचबरोबर या औषधांना / रसायनांना केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही कायद्यामध्ये मान्यता देण्यात आलेली नाही. केवळ आकर्षक जाहिरात, सुबक पॅकिंग व कंपनी/ विक्रेत्यांच्या दिशाभुल करणा-या दाव्यामुळे या वाढ संप्रेरके, संजिवके, हार्मोन्सचा वापर करण्यास शेतक-यांना भाग पाडले जाते.
तरी या निवेदनाव्दारे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, अशा अपप्रचाराला बळी न पडता अनावश्यक औषधे/ रसायनाचा वापर टाळावा तसेच अशा कायिक वाढीस कारणीभुत रसायनामुळे पिकावर येणा-या रसशोषक किडीच्या प्रार्दुभवापासुन पिक वाचवावीत व पर्यायाने किटकनाशकाच्या फवारणीवरील खर्च वाचवावा. अधिक माहितीसाठी आपल्या गावाच्या कृषि सहाय्यक, कृषि अधिकारी तसेच नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा. असे आवाहन
कृषि आयुक्त, पुणे यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment