जळगाव, दि. 13 - महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव द्वारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 14 मार्च ते 20 मार्च, 2018 या कालावधीत जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे कार्यकारी अधिकारी राहूल मुंडके यांनी दिली आहे.
राज्य शासनाने राज्यातील पुर, भुकंप, चक्रीवादळ, दुष्काळ अशा विविध नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती निवारणाकरिता व आपत्तीचे व्यवस्थापन प्रभावीपणे व्हावे. या हेतुने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एस.डी.आर.एफ.) स्थापना केली आहे. या दलाच्या दोन कंपन्या (बटालियन) स्थापन केल्या असून यापैकी एक कंपनी राज्य राखीव पोलीस गट क्र. 6 धुळे येथे व एक कंपनी राज्य राखीव पोलीस गट क्र. 4 नागपुर येथे कार्यान्वीत आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मंत्रालय हे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कंपन्यांना (एस.डी.आर.एफ.) राज्यात आपत्तीच्या स्थळी मदत व बचावकार्य करण्यासाठी नियुक्त करणार आहे. जेणेकरुन राज्यात अशा आपत्कालीन प्रसंगी प्रशिक्षीत मनुष्यबळ व साहित्याच्या सहाय्याने शोध, मदत व बचावकार्य करुन आपत्तींमुळे होणारी जिवित व वित्त्ाहानी कमी करण्यास मदत करील.
यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशो राजे निंबाळकर यांनी महाराष्ट़ आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगावच्यावतीने 14 ते 20 मार्च, 2018 या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध यंत्रणासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे.
या सप्ताहाचे उद्घाटन 14 मार्च 2018 रोजी जिल्हा नियोजन सभागृह येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. याठिकाणी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील (MIDC) तसेच दिपनगर औष्णिक विद्युत निर्मिती कंपनी, भुसावळ व वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी येथील सुरक्षा अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहे. त्यांना औद्योगिक क्षेत्रातील अपघात, विषारीवायु गळती, अग्निशमन, शोध व बचावकार्य याबाबत साहित्यांचे प्रात्यक्षिक, एलसीडीद्वारा माहितीपट व व्याख्यानांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
15 मार्च, 2018 रोजी महानगरपालिका सभागृह येथे सकाळी 11 वाजता मनपा, जळगाव व जिल्ह्यातील सर्व नगर पालिकांमधील अग्नीशमन कर्मचारी सहभागी होणार आहे. त्यांना मनपा, जळगाव येथील सतरा मजली इमारतीवर अग्निशमन, शोध व बचाव कार्य, साहित्यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
16 मार्च 2018 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सकाळी 11 वाजता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, मुख्य इमारत व परीसरातील सर्व इमारतीतील अधिकारी व कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी व सुरक्षा कर्मचारी सहभागी होणार आहे. त्यांना उमविच्या मुख्य इमारत व परिसरात भुकंप, आग, यासारख्या आपत्कालीन काळात अग्निशमन शोध व बचाव कार्य, साहित्यांचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन तसेच उमवि प्रशासनाने घ्यावयाची दक्षता यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
17 मार्च 2018 रोजी मंगलम सभागृह, जिल्हा पोलीस कवायात मैदान, जळगाव येथे सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक पोलीस मित्र, निर्भया पथकाचे स्वयंसेवक सहभागी होणार आहे. त्यांना उष्माघात, अतिवृष्टी, पुर, वज्राघात, वादळ, तसेच आकस्मीत लागणारी आग, वायुगळती, रस्ते अपघात, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, भुकंप इ. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती दरम्यान बचावकार्य याबाबतची माहिती देण्यात येणार आहे.
19 मार्च 2018 रोजी हतनुर धरण, ता. भुसावळ येथे सकाळी 11 वाजता भुसावळ, यावल, रावेर, बेादवड, मुक्ताईनगर तालुक्यातील शोध व बचाव पथके, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील सहभागी होणार आहे. त्यांना अतिवृष्टी, पुरविमोचन या नैसर्गिक आपत्ती दरम्यान करावयाची मदत व बचावकार्य याबाबत लाईफजॅकेट, लाईफ रिंग व बोटींच्या सहाय्याने करावयाचे बचावकार्य याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
20 मार्च 2018 रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जळगांव येथे सकाळी 11 वाजता या सप्ताहाचा समारोप समारंभ होणार आहे. या समारंभात जळगाव, जामनेर, एरंडोल, चोपडा, धरणगाव, पारोळा, अमळनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातील शोध व बचाव पथके सहभागी होणार आहे. त्यांना उष्माघात, अतिवृष्टी, पुर, वज्राघात, वादळ तसेच आकस्मीत आग, वायुगळती, रस्ते अपघात, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, भुकंप आदि बाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या कालावधीत धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची 15 ते 20 अधिकारी व कर्मचारी यांची एक तुकडी त्यांच्या प्रशिक्षण साहित्यासह उपस्थित राहणार आहे. या तुकडीद्वारे आगामी उन्हाळा व मान्सुन कालावधी लक्षात घेवुन उष्माघात, अतिवृष्टी, पुर, वज्राघात, वादळ, तसेच आकस्मीत लागणारी आग, वायुगळती, रस्ते अपघात, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, भुकंप इ. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती दरम्यान शासकिय विभाग व नागरीकांनी घ्यावयाची दक्षता व उपाय. अशा आपत्कालीन परिस्थीतीत “काय करावे व काय करु नये” तसेच प्रथमोपचार, शोध, मदत व बचावकार्य, योग्य समन्वय इ. बाबतचे साहित्यांचे प्रात्यक्षिक, एलसीडीद्वारा माहितीपट व व्याख्यानांच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे. जेणेकरुन जिल्ह्यात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होवुन भविष्यात होणारी जिवीत व वित्त हानी टाळता येणे शक्य होणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,जळगांव यांचेशी मो. क्र. 9373789064 वर संपर्क साधावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे कार्यकारी अधिकारी राहूल मुंडके यांनी कळविले आहे.
राज्य शासनाने राज्यातील पुर, भुकंप, चक्रीवादळ, दुष्काळ अशा विविध नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती निवारणाकरिता व आपत्तीचे व्यवस्थापन प्रभावीपणे व्हावे. या हेतुने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एस.डी.आर.एफ.) स्थापना केली आहे. या दलाच्या दोन कंपन्या (बटालियन) स्थापन केल्या असून यापैकी एक कंपनी राज्य राखीव पोलीस गट क्र. 6 धुळे येथे व एक कंपनी राज्य राखीव पोलीस गट क्र. 4 नागपुर येथे कार्यान्वीत आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मंत्रालय हे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कंपन्यांना (एस.डी.आर.एफ.) राज्यात आपत्तीच्या स्थळी मदत व बचावकार्य करण्यासाठी नियुक्त करणार आहे. जेणेकरुन राज्यात अशा आपत्कालीन प्रसंगी प्रशिक्षीत मनुष्यबळ व साहित्याच्या सहाय्याने शोध, मदत व बचावकार्य करुन आपत्तींमुळे होणारी जिवित व वित्त्ाहानी कमी करण्यास मदत करील.
यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशो राजे निंबाळकर यांनी महाराष्ट़ आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगावच्यावतीने 14 ते 20 मार्च, 2018 या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध यंत्रणासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे.
या सप्ताहाचे उद्घाटन 14 मार्च 2018 रोजी जिल्हा नियोजन सभागृह येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. याठिकाणी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील (MIDC) तसेच दिपनगर औष्णिक विद्युत निर्मिती कंपनी, भुसावळ व वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी येथील सुरक्षा अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहे. त्यांना औद्योगिक क्षेत्रातील अपघात, विषारीवायु गळती, अग्निशमन, शोध व बचावकार्य याबाबत साहित्यांचे प्रात्यक्षिक, एलसीडीद्वारा माहितीपट व व्याख्यानांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
15 मार्च, 2018 रोजी महानगरपालिका सभागृह येथे सकाळी 11 वाजता मनपा, जळगाव व जिल्ह्यातील सर्व नगर पालिकांमधील अग्नीशमन कर्मचारी सहभागी होणार आहे. त्यांना मनपा, जळगाव येथील सतरा मजली इमारतीवर अग्निशमन, शोध व बचाव कार्य, साहित्यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
16 मार्च 2018 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सकाळी 11 वाजता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, मुख्य इमारत व परीसरातील सर्व इमारतीतील अधिकारी व कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी व सुरक्षा कर्मचारी सहभागी होणार आहे. त्यांना उमविच्या मुख्य इमारत व परिसरात भुकंप, आग, यासारख्या आपत्कालीन काळात अग्निशमन शोध व बचाव कार्य, साहित्यांचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन तसेच उमवि प्रशासनाने घ्यावयाची दक्षता यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
17 मार्च 2018 रोजी मंगलम सभागृह, जिल्हा पोलीस कवायात मैदान, जळगाव येथे सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक पोलीस मित्र, निर्भया पथकाचे स्वयंसेवक सहभागी होणार आहे. त्यांना उष्माघात, अतिवृष्टी, पुर, वज्राघात, वादळ, तसेच आकस्मीत लागणारी आग, वायुगळती, रस्ते अपघात, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, भुकंप इ. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती दरम्यान बचावकार्य याबाबतची माहिती देण्यात येणार आहे.
19 मार्च 2018 रोजी हतनुर धरण, ता. भुसावळ येथे सकाळी 11 वाजता भुसावळ, यावल, रावेर, बेादवड, मुक्ताईनगर तालुक्यातील शोध व बचाव पथके, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील सहभागी होणार आहे. त्यांना अतिवृष्टी, पुरविमोचन या नैसर्गिक आपत्ती दरम्यान करावयाची मदत व बचावकार्य याबाबत लाईफजॅकेट, लाईफ रिंग व बोटींच्या सहाय्याने करावयाचे बचावकार्य याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
20 मार्च 2018 रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जळगांव येथे सकाळी 11 वाजता या सप्ताहाचा समारोप समारंभ होणार आहे. या समारंभात जळगाव, जामनेर, एरंडोल, चोपडा, धरणगाव, पारोळा, अमळनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातील शोध व बचाव पथके सहभागी होणार आहे. त्यांना उष्माघात, अतिवृष्टी, पुर, वज्राघात, वादळ तसेच आकस्मीत आग, वायुगळती, रस्ते अपघात, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, भुकंप आदि बाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या कालावधीत धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची 15 ते 20 अधिकारी व कर्मचारी यांची एक तुकडी त्यांच्या प्रशिक्षण साहित्यासह उपस्थित राहणार आहे. या तुकडीद्वारे आगामी उन्हाळा व मान्सुन कालावधी लक्षात घेवुन उष्माघात, अतिवृष्टी, पुर, वज्राघात, वादळ, तसेच आकस्मीत लागणारी आग, वायुगळती, रस्ते अपघात, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले, भुकंप इ. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती दरम्यान शासकिय विभाग व नागरीकांनी घ्यावयाची दक्षता व उपाय. अशा आपत्कालीन परिस्थीतीत “काय करावे व काय करु नये” तसेच प्रथमोपचार, शोध, मदत व बचावकार्य, योग्य समन्वय इ. बाबतचे साहित्यांचे प्रात्यक्षिक, एलसीडीद्वारा माहितीपट व व्याख्यानांच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे. जेणेकरुन जिल्ह्यात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होवुन भविष्यात होणारी जिवीत व वित्त हानी टाळता येणे शक्य होणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,जळगांव यांचेशी मो. क्र. 9373789064 वर संपर्क साधावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे कार्यकारी अधिकारी राहूल मुंडके यांनी कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment