जळगाव,
दि. 9 - शासनाचा कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),
जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सागरपार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या
जिल्हा कृषि महोत्सवात आज (10 मार्च रोजी) सकाळी 11 वाजता आत्मा अंतर्गत निवड
केलेल्या सहा उत्कृष्ट शेतकरी, पाच शेतकरी गट व मागील वर्षी शासनाने सन्मामित
केलेल्या जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. राज्याचे महसुल,
मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.
चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते व जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन, सहकार
राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार श्रीमती
रक्षाताई खडसे व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या मान्यवरांच्या उपस्थितीत हा
सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे.
सन्मान
व सत्कार करण्यात येणारे शेतकरी - श्री. नाना भाऊसिंग पाटील, पिंप्री खु. ता.
चाळीसगाव, श्री वसंत वामन पाटील, परधाडे ता. पाचोरा, श्री. मधुकर नारायण पाटील,
सुनसगाव ता. जामनेर, श्री. संदिप जगदिश पाटील, मु. पो. करंज, ता. जि. जळगाव, श्री.
अनिल उखर्डा पाटील, मु. पो. पारंबी, ता. मुक्ताईनगर, श्री. कमलेश धर्मराज
पाटील कु.पो. बाहुटे, ता. पारोळा.
शेतकरी गट - धनदाई माता शेतकरी गट, शिंदी, ता. भडगाव, जय भवानी शेतकरी
गट, शिरसगाव, ता. चाळीसगाव, कुलस्वामिनी शेतकरी गट, मु.पो. देवगाव देवळी, ता.
अंमळनेर, जय शिवाजी कृषि विज्ञान मंडळ, मु.पो. सुनसगाव, ता. भुसावळ, संत जनाबाई
महिला कृषि विज्ञान मंडळ, मु.पो. मस्कावद, ता. रावेर.
शासनाने सन्मानित केलेले शेतकरी - कृषिभूषण श्री. विश्वासराव आनंदाराव पाटील, मु. पो. लोहारा ता. पाचोरा, श्री.
प्रेमानंद हरी महाजन, मु. पो. तांदलवाडी, ता. रावेर, श्री. नारायण शशीकांत चौधरी,
मु. पो. भालोद, ता. यावल, श्री. रविंद्र मार्तंड पाटील, मु. पो. चिंचोली, ता. यावल
यांचा सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे.
मका
पीकावर चर्चासत्राचे आयोजन
जिल्हा कृषि महोत्सवात आज (10 मार्च
रोजी) मका पीकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 10 मार्च
रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत मका- एकरी
70 क्विंटल उत्पादन तंत्रज्ञान व अनुभव या विषयावर डॉ. बी. डी. जडे, वरिष्ठ
शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन आणि मोतीलाल मयाराम पाटील, प्रगतीशील शेतकरी, एकलग्न यांचे
तर दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत खरेदीदार
विक्रेता संमेलन, शेतकरी उत्पादक कंपनी- कृषि क्षेत्रातील क्रांतीपर्व या
विषयावर नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स
प्रोडयुसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले
आहे.
शेतकरी
सन्मान व चर्चासत्रास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे
आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
000
No comments:
Post a Comment