जळगाव,
दि. २० - जलयुक्त्ा शिवार अभियानातंर्गत गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील 660 गावांमध्ये 221 कोटी 32
लाख 55 हजार रुपये खर्चाची 12 हजार 397 कामे पूर्ण झाली आहे. तर 527 कामे प्रगतीपथावर
आहेत. या कामांमुळे जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये 1 ते 1.35 मीटरने वाढ झाली आहे. त्याचबरोबर
2.13 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले असून पीक उत्पादनामध्ये एकूण 20 टक्के वाढ
झाल्याचे दिसून आल्याची माहिती कृषि विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त
महाराष्ट्र २०१९ अतंर्गत येत्या पाच वर्षात राज्यातील २५ हजार गावांमध्ये सन २०१५
पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत जिल्ह्यात सन २०१५-१६
मध्ये पहिल्या टप्पात एकूण २३२ गावांची निवड करण्यात आली होती. यासाठी एकूण ७ हजार
२०० कामांचा १२१.५६ कोटी रुपयांचा आराखडा
तयार करण्यात आला होता. प्रथम टप्प्यात एकूण ७४०७ कामे पूर्ण करण्यात येवून रक्कम
रु. १२४.५४ कोटी निधी खर्च करण्यात आला आहे. भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या
निरिक्षण विहिरींच्या नोंदीवरुन पाण्याच्या पातळीत १ ते १.३५ मीटरने वाढ झाल्याचे
दिसून आले आहे. त्यामुळे रब्बी हंगाम २०१६ अंतर्गत २.१३ लाख हेक्टर क्षेत्र
लागवडीखाली आले असून पिक उत्पादनामध्ये एकूण २० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
त्याचबरोबर
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सन २०१६-१७ मधील दुसऱ्या टप्पात एकूण २२२ गावे
निवडण्यात आली होती. या निवड केलेल्या गावात एकूण ४ हजार ८५६ कामे प्रस्तावित
करण्यात आली होती. यासाठी १४६.३१ कोटी रुपयांचा आराखडा अंतिम करण्यात आला होता. या
टप्पात निवडण्यात आलेल्या गावांत आतापर्यंत एकूण ४ हजार ७४० कामे पूर्ण झाली आहे.
यावर ९६ कोटी ७८ लाख ५५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उर्वरित कामे
प्रगतीत असुन ही कामे मार्च १८ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जलयुक्त शिवार अभियानातील सन २०१७-१८ च्या तिसऱ्या टप्पात एकूण २०६
गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये एकूण ४ हजार २७१ कामे प्रस्तावित केली
असून यासाठी ९१ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा मंजुर करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार
अभियानातील तिसऱ्या टप्पातील प्रस्तावित कामांची प्रशासकीय मंजुरी व निविदा
प्रकिया सुरु असुन आहे. तर एकुण ६१६ कामे सुरु करण्यात आली असून २०५ कामे पूर्ण झाली
आहेत. उर्वरित कामे जुन, २०१८ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच
या अभियानातंर्गत सन २०१८-१९ या चौथ्या टप्पातंर्गत शासनाने ठरवून दिलेल्या
निकषानुसार गावांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे कृषि विभागाच्या
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
000
No comments:
Post a Comment