जळगाव, दि. 31 - शासनाच्यावतीने राज्यात येत्या तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत यावर्षी राज्यात 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेबाबत राज्यातील नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी वन विभागाच्यावतीने चांदा (चंद्रपूर) ते बांदा, सावंतवाडी (सिंधुदूर्ग) वृक्ष लागवड जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आला आहे. आज या चित्ररथाचे आगमन जळगाव शहरात झाले. यानिमित्ताने येथील काव्यरत्नावली चौकात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी चित्ररथाचे स्वागत केले. तसेच जिल्ह्यात 13 कोटी वृक्ष लागवड, हरीतसेना, महाराष्ट्र वनसंवर्धन इ. बाबत जनजागृती होण्यासाठी या चित्ररथास हिरवी झेंडी दाखविण्यात आल्यानंतर चित्ररथ मार्गस्थ करण्यात आला.
याप्रसंगी जळगावचे उप वनसंरक्षक डी. डब्लू, पगार, यावल चे उप वनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, वन परिक्षेत्र अधिकारी पाटील यांचेसह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
या चित्ररथाच्या गाडीत मोठ्या प्रोजेक्टरवर वृक्षलागवड, हरीतसेना व महाराष्ट्र वन संवर्धन संदर्भात जनजागृतीची चित्रफित दाखवण्यात येत आहे. चित्ररथाव्दारे जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रबोधन करण्यात येणार असून वृक्ष लागवडीचे महत्व विशद केले जाणार असून नागरीकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी जाणीवजागृती करण्यात येणार आहे. 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेला दोन वर्षापासून जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्ये अजून वाढ होणे अपेक्षित असल्याचे उप वनसंरक्षक श्री. पगार यांनी याप्रसंगी सांगितले.
०००
याप्रसंगी जळगावचे उप वनसंरक्षक डी. डब्लू, पगार, यावल चे उप वनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, वन परिक्षेत्र अधिकारी पाटील यांचेसह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
या चित्ररथाच्या गाडीत मोठ्या प्रोजेक्टरवर वृक्षलागवड, हरीतसेना व महाराष्ट्र वन संवर्धन संदर्भात जनजागृतीची चित्रफित दाखवण्यात येत आहे. चित्ररथाव्दारे जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रबोधन करण्यात येणार असून वृक्ष लागवडीचे महत्व विशद केले जाणार असून नागरीकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी जाणीवजागृती करण्यात येणार आहे. 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेला दोन वर्षापासून जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्ये अजून वाढ होणे अपेक्षित असल्याचे उप वनसंरक्षक श्री. पगार यांनी याप्रसंगी सांगितले.
०००
No comments:
Post a Comment