Monday, 30 April 2018

ध्वजारोहण, शानदार संचलनाने महाराष्ट्र राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तींने दोन झाडे लावावीत - ना. सदाभाऊ खोत यांचे आवाहन











जळगाव, दि. 1-  ध्वजारोहण, मानवंदना आणि त्यानंतर पार पडलेल्या शानदार संचलनाने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ व्या वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रात प्रगती करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्यातील वाढते तापमान लक्षात घेता भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असून यासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत येत्या पावसाळ्यात प्रत्येक नागरीकाने किमान दोन झाडे लावून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे. असे आवाहन राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय) रशीद तडवी, सचिन सांगळे, जितेंद्र पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
    यावेळी ना. खोत म्हणाले की, आजपासून राज्य शासनाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शहिद सन्मान योजनेतंर्गत शहिदांच्या पत्नींना एसटी बस मध्ये मोफत प्रवास सवलत योजना सुरु केली आहे. तसेच सर्व नागरीकांशी संबंधित व जिव्हाळ्याचा विषय असलेला डिजीटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ देण्याच्या मोहिमेचा शुभारंभही आजपासून होत आहे. शासन सर्वसामान्य नागरीकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस कवायत मैदान येथे सकाळी आठ वाजता ना. खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शानदार संचलन करण्यात आले. त्यात जिल्हा पोलीस दल, होमगार्ड, वाहतुक पोलीस, महिला पोलीस पथक, बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन पथक, पोलीस बॅण्ड पथक, वरुण पथक, फायर फायटर पथक, रेस्क्यु व्हॅन, मिडीया व्हॅन, इंडियन रेड क्रॉस सोसायटी मोबाईल ब्लड डोनर व्हॅन, निर्भया पथकांनी संचलनात सहभाग घेतला. या संचलनाचे नेतृत्व कमांडिग ऑफिसर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील यांनी केले. यावेळी ना. खोत यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू, कर्मचारी, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळालेले पोलीस कर्मचारी, शहिद सैनिकांच्या विधवा यांना गौरविण्यात आले.
सन्मानार्थिंची नावे याप्रमाणे -
जिल्हा युवा पुरस्कार-
युवक- भूषण दिलीप लाडवंजारी,
संस्था- इंडियन रेड क्रॉस सोसायटी
गुणवंत खेळाडू - भोलेनाथ चौधरी, वेटलिफटीग, विशाखा सपकाळे, तायक्वांदो,
दिव्यांग खेळाडू - अंश देवेंद्र पिल्ले, जलतरण
क्रीडा मार्गदर्शक - ‌श्री प्रविण ‌ठाकरे,
क्रीडा संघटक कार्यकर्ता-  श्रीमती अनिता कोल्हे
पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह-
पोलीस अधिकारी/कर्मचारी :- सर्वश्री. ज्ञानेश्वर शिवराम पाकळे, पोलीस उप निरीक्षक नेमणूक पोलीस ठाणे, निंभोरा, काशिनाथ त्रिंबक सुरळकर, पोलीस उपनिरीक्षक नेमणूक पोलीस ठाणे, भुसावळ शहर, सहाय्यक फौजदार संजय सदाशिव पंजे. नेमणूक पोलीस ठाणे, चाळीसगाव शहर, सहाय्यक फौजदार भिकन गोविंद सोनार, नेमणूक मोटार परिवन विभाग, जळगाव. पोलीस हेडकाँस्टेबल :- प्रविण प्रल्हाद पाटील, नेमणूक पोलीस अधिकारी कार्यालय, वाचक शाखा, माणिक सोनजी सपकाळे नेमणूक पोलीस ठोण भुसावळ बाजार पेठ, सुभाष सिताराम सुर्यवंशी नेमणूक पोलीस मुख्यालय, वसंत वल्लभ मोरे, नेमणूक ए. टी. सी. जळगाव, राजेंद्र दिनकरराव पाटील नेमणूक पोलीस ठाणे पिंपळगाव हरेश्वर, प्रमोद गंगाधर चौधरी नेमणूक पोलीस ठाणे, रावेर. पोलीस नाईक :- महेंद्र राजाराम पाटील ने. स्थागुशा, सचिन अशोक चौधरी ने. पोलीस मुख्यालय, अशरफोद्यीन शेख निजामोद्यीन ने. पोलीस ठाणे, एमआयडीसी. पोलीस हवालदार :- धनराज नामदेव शिंदे ने. ए.टी.सी. जळगाव, नंदकिशोर काशिनाथ सावखेडकर ने. पीसीआर, जळगाव.
डिजीटल स्वाक्षरीयुक्त 7/12 उतारा देण्याच्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक दिलेले तलाठी -
सर्वश्री. टी. सी. बारेला, ए. ए. तडवी, जी. सी. बारेला, वाय. आय. तडवी, व्ही. डब्लू. पाटील, ए. एस. महाजन, एस. ए. झोटे, प्रविण शिंपी, एस. टी. जगताप.
आदर्श तलाठी पुरस्कार - जनार्दन दत्तात्रय भंगाळे, हिंगोणे, ता. यावल.
शहिद सन्मान योजनेतंर्गत मोफत एसटी प्रवास सवलत कार्ड वितरण केलेल्या वीरपत्नी - श्रीमती निर्मला सुवालाल हनुवते, कल्पना विलास पवार, सरला भानुदास बेडीस्कर, सुनंदा वसंत उबाळे, सुरेखा पोपट पाटील, कविता राजू साळवे, कल्पना देविदास पाटील, रंजना अविनाश पाटील.
     रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत जिल्हा पोलीस दल, वाहतुक शाखा, परिवहन विभाग यांच्या वतीने आज हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला पोलीस कवायत मैदानावर ना. खोत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. ही रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन परिवहन कार्यालयात समारोप करण्यात आला.
त्यानंतर ना. खोत यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गयाज उस्मानी आणि राजेश यावलकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील तसेच सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात ध्वजारोहण
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारातही महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इमारतीतील सर्व कार्यालयांचे प्रमुख तसेच सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते.
                                                                               ०००

जिल्हाधिकारी कार्यालयात संत तुकडोजी महाराज जयंती संपन्न



           जळगाव दि :- 30  संत तुकडोजी महाराज जयंती निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात   निवासी  निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यर्पण करून त्यांना अभिवादन केले . याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव,नायब तहसिलदार विकास लाडवंजारी,आदि अधिकारी कर्मचारी
उपस्थित होते.
00000

कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांचा सुधारीत जिल्हा दौरा


        जळगाव, दि. ३० - राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री  ना. सदाभाऊ खोत हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यकम याप्रमाणे -
            सोमवार दि. ३० एप्रिल  2018 रोजी रात्री ९.५० वाजता सेवाग्राम एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण.  रात्री १०.०५ वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम.
         मंगळवार दि. १ मे, २०१८ रोजी सकाळी ७.०० वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे राखीव.  ७.४५ वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून मोटारीने पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय जळगावकडे प्रयाण. ७.५७ वा. पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय जळगाव येथे आगमन. सकाळी ८.०० वा. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८ वा वर्धापन दिन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. राष्ट्रध्वज वंदन, सकाळी ८.०५ ते ९.०५ वा. शुभेच्छापर भाषण, बक्षिस व प्रमाणपत्र वितरण समारंभ कार्यक्रम, पोलीस संचलन, ज्येष्ठ नागरीक व स्वातंत्र्य सैनिक यांना शुभेच्छा. सकाळी ९.०५ वा. पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथून मोटारीने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण.  सकाळी ९ वा. २० वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी ११ वा. २० वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय  मोटारीने  जिल्हाधिकारी, कार्यालय जळगावकडे प्रयाण.  दुपारी  ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आगमन. दुपारी ११.३० ते १२.०० वा. ऑन लाईन डिजीटल स्वाक्षरीयुक्त गा.न.नं.संगणीयुक्त ७/१२ चे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरण आणि तहसिलदार व उप विभागीय अधिकारी यांना प्रशस्तीपत्र वितरण समारंभास उपस्थिती. दुपारी १२.०० ते १.०० वा. मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते ऑन-लाईन डिजीटल स्वाक्षरीयुक्त गा.न.नं संगणीकृत ७/१२ चे लोकार्पण सोहळ्यात व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थिती. दुपारी १.०० ते १.३० वाजेपर्यंत राखीव. दुपारी १.३० वा. शासकीय मोटारीने रेल्वे स्थानककडे प्रयाण.  दुपारी १.४५ वा. जळगाव रेल्वे स्थानक येथून गितांजली एक्सप्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण. 
00000

Friday, 27 April 2018

किसान कल्याण तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन


          जळगाव,दि.27:- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 2 ते 15 मे या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘‘किसान कल्याण कार्यशाळा’’ आयोजित करण्यात येत आहेत. जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. 2 मे 2018 रोजी कृषी विज्ञान केंद्र मुमराबाद येथे सकाळी 10 वाजता आयोजित केली असून या कार्यशाळेस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. ना. उज्वलाताई पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव दिवेकर, समाज कल्याण सभापती श्री. प्रभाकर सोनवणे, खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, प्रा. चंद्रकांत सोनवणे आदि स्थानिक लोक प्रतिनिधी व प्रगतीशील शेतकरी उपस्थितीत राहणार असून पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कृषि सलग्न विभागातील विविध योजनांवर चर्चासत्र प्रदर्शन मार्गदर्शन सत्र आयोजित केले जाणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून यांचा लाभ घ्यावा असे आवाहन अधिक्षक कृषि अधिकारी श्री. विवेक सोनवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 
०००

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा


      जळगाव,दि.27- राज्याचे रोजगार हमी योजना, पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            मंगळवार, दि. 1 मे 2018 रोजी  रात्री 8.40 वाजता दोंडाईचा जि. धुळे येथुन शासकीय/खाजगी वाहनाने चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 10.40 वाजता चाळीसगाव जि. जळगाव येथे आगमन व हावडा मुंबई मेलने मुंबईकडे प्रयाण.
०००

Thursday, 26 April 2018

२९ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी

     जळगाव, दि. २६ - सडक सुरक्षा-जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेऊन वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहतुकीच्या नियमांबाबत नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी. याकरीता जळगाव जिल्हा पोलीस दल, वाहतुक शाखा व उप प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्माने जिल्ह्यात २३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे.
     या अभियानाच्यानिमित्ताने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी. रावल यांनी अपघाताची कारणे, त्यावरील उपाययोजना त्याचबरोबर वाहन चालविताना काय करावे व काय करु नये. याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी याकरीता काही सुचना केल्या आहेत. त्यानिमित्ताने- 
अपघात कारणे आणि उपाययोजना
अपघाताची कारणे -
अ) मानवी चुका:
१. अतिवेगाची नशा.
२. धोकादायक ओव्हरटेकिंग/लेन कटिंग.
३. मद्यपान करून गाडी चालविणे.
४. गाडीत अनेक प्रवासी कोंबणे वा क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणे.
५. गाडी चालविण्याचे नीट प्रशिक्षण न घेणे वा वाहतूक नियमांचे अपुरे ज्ञान.
६. चालकांवरील अतिताण, थकवा.
७. कुठेही गाडी उभी करणे.
८. हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे.
ब) हवामान:
१. धुके किंवा मुसळधार पाऊस
२. प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने टायर फुटणे.
क) इतर:
१. जनावर रस्त्यात आडवे येणे.
२. पादचाऱ्यांची चूक.
३. दरड कोसळणे.
४. वाहतुकीची कोंडी.
हे करा – (Do's):
१. लेनची शिस्त नेहमी पाळा.
२. आखून दिलेली वेगमर्यादा पाळा.
३. महामार्गावर मदतीसाठी उभ्या असलेल्या वाहनाची मदत करा.
४. नेहमी सीट बेल्ट वापरा. त्यात कमीपणा मानू नका.
५. गाडी चालविताना नेहमी सतर्क राहा.
६. रात्रीच्या वेळी गाडी चालविताना पुढील व मागील दिवे, पार्किंग लाइट सुरू आहेत का याची तपासणी करा.
७. वाहतूक नियम पाळा.
हे करू नका – (Dont):
१. मद्यपान करून गाडी चालवू नका.
२. धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नका.
३. कुठेही गाडी उभी करू नका.
४. गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरू नका.
ओव्हरटेक करताना:
* डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे टाळा.
* काही गाडी चालक त्यांच्या गाडीचा उजवीकडील ब्लिंकर अनवधानाने सुरू ठेवतात की, जेणेकरून तुम्हाला ओव्हरटेक करणे सोपे आहे असे वाटावे; परंतु त्यावर विश्वास ठेवणे हे अपघाताला आमंत्रण असते. तुम्ही स्वत:च ओव्हरटेकबाबतचा निर्णय घेतला पाहिजे.
* एका वेळी एकपेक्षा अधिक वाहनांना ओव्हरटेक करू नका. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लेनमध्ये पुन्हा येणे शक्य होत नाही.
* ओव्हरटेक करताना तुमच्या उजवीकडील आरशात पाहणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आणखी एक गाडी तुम्हाला ओव्हरटेक करू इच्छित असेल.
* आत्मविश्वास नसेल तर ओव्हरटेक करू नका.
* आपल्या पुढे ओव्हरटेक करीत असलेल्या वाहनासोबत समांतर ओव्हरटेक करू नका. अपघाताचे हे एक कारण आहे.
* पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा.
* वेग नियंत्रणात ठेवा. अधिक वेग म्हणजे गाडी तात्काळ थांबविण्यासाठी अधिक काळजी व परिश्रम आवश्यक
* अवजड वाहनांच्या मागे राहून गाडी चालवू नका. ट्रकसारख्या वाहनांना मागचे दिसत नसते. त्यामुळे तुमची गाडी मागे आहे याची त्याला माहिती होत नाही आणि त्यामुळे तो सुरक्षेची काळजी घेईल अशी अपेक्षा नसते.
* महामार्गावर गाडी चालविताना तिची तांत्रिक स्थिती दर्जेदार हवी. ब्रेक्स हे महत्त्वाचे असून कधी अचानक गाडी थांबवावी लागेल, याचा नेम नसतो.
* आपल्यावर वेगाची मर्यादा घाला.
* जी गाडी हाताळलेली नाही, त्याची नीट माहिती करून घ्या आणि मगच चालवा.
* गाडीच्या वैशिष्टय़ांविषयी माहिती करून घ्या. उदा. गाडीचा वेग वाढण्याची मर्यादा, तिची रस्ता धरून राहण्याची क्षमता, स्टिअरिंगची संवेदनक्षमता, ब्रेक्सची स्थिती आदी.
* महामार्गावर गाडी चालविताना गाण्यांचा आवाज कमी ठेवा.
* १०० टक्के एकाग्रता आणि वचनबद्धता राखूनच गाडी चालवा. झोप येत असेल तर स्टिअरिंग हातात घेऊ नका.
                                                                        000