जळगाव, दि.२३ - सुरक्षित प्रवासासाठी वाहतुक नियमांचे पालन करतानाच मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक असूनही आपल्या देशातील नागरीकांना त्यांच्या सुरक्षेसाठी दंड करावा लागतो, ही अत्यंत दुर्देवी बाब असल्याची खंत आज जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केली.
सडक सुरक्षा-जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्हा पोलीस दल, वाहतुक शाखा व उप प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्माने जिल्ह्यात आजपासून ७ मे पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे उद्घाटन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे हे होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. कराळे बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शहराचे महापौर ललीत कोल्हे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक राजेंद्र देवरे, पोलीस उप अधिक्षक सचिन सांगळे, वरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील काळे, बोदवडच्या नगराध्यक्षा मुमताज बी. सय्यद बागवान आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. कराळे पुढे म्हणाले की, देशात दरवर्षी चार ते साडेचार लाख अपघात हे फक्त वाहतुक नियमांचे पालन न केल्यामुळे होत असतात. त्यात दीड लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होतो. तर अनेक व्यक्ती जायबंदी होतात, मरणयातना भोगत असतात. जळगाव जिल्ह्यातही रस्ते अपघातात दरवर्षी चारशेपेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यु होतो. परंतु तरीही सुध्दा आपण वाहतुक नियमांचे पालन करीत नाहीत, इतके आपण सगळे भावनाशून्य झालो आहोत काय असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला. काही व्यक्ती ह्या स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाही यासाठी शासनाने वाहतुकीचे नियम केले असून या नियमांची जनजागृती व्हावी, यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. परंतु अशा अभियानाची गरज का निर्माण होते याचा कोणीही विचार करत नाही याचे आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय संस्कृतीबद्दल जगात नितांत आदर आहे. परंतु वाहतुक नियमांच्या उल्लंघनाबाबत परदेशी नागरीक आपल्याला नाव ठेवतात ही खेदाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. अपघातात कर्ता पुरुषाचा मृत्यु झाला तर त्याचे कुटूंब उघड्यावर तर पडतेच. त्याचबरोबर राष्ट्राचेही नुकसान होते. याकरीता नागरीकांनी आपले जीवन लाख मोलाचे आहे याची जाणीव ठेवावी. व त्याची सुरक्षितता जपावी याकरीता वाहन चालविताना मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असतो याची जाणीव ठेवावी तसेच हे अभियान त्या कालावधीपुरते मर्यादित न राहता नागरीकांनी वर्षभर नियमांचे पालन करावे असे आवाहनही श्री. कराळे यांनी केले.
याप्रंसगी आमदार सुरेश भोळे म्हणाले की, अधिकारी हे शासन व जनतेमधील दुवा असतात. याकरीता अधिकाऱ्यांना नागरीकांना शासनाच्या योजनांची तसेच नियमांची माहिती होण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर समाज म्हणून नागरीकांनीही आपली जबाबदारी ओळखून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. विशेषतऱ् रिक्षा चालकांना या नियमांची माहिती होणे आवश्यक आहे. तसेच वाहन परवाना घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस एक झाड लावण्याची विनंती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियानाची पार्श्वभूमी सांगतानाच परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच परिवहन विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात आल्या असून संगणकीय वाहन चाचणी घेणारे जळगाव परिवहन कार्यालय हे राज्यातील दुसरे कार्यालय असल्याचे आवर्जून सांगितले. याप्रसंगी वरणगावचे नगराध्यक्ष व महापौर ललीत कोल्हे आणि राजेंद्र देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. याप्रसंगी परिवहन कार्यालयाने रस्ता सुरक्षेसंदर्भात तयार करण्यात आलेल्या हेल्मेट वापरणे हे डोक्याचे काम आहे या मार्गदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी विनोद ढगे यांच्या चमूने पथनाट्याच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा संदर्भात प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. राजेंद्र देशमुख यांनी तर उपस्थितांचे आभार परिवहन निरिक्षक श्री. मोरे यांनी मानले. या कार्यक्रमास परिवहन, एसटी महामंडळ, वाहतुक शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच वाहन प्रशिक्षण संस्था, वाहतुक युनियन, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. या अभियाना कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
000
सडक सुरक्षा-जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्हा पोलीस दल, वाहतुक शाखा व उप प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्माने जिल्ह्यात आजपासून ७ मे पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे उद्घाटन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे हे होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. कराळे बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शहराचे महापौर ललीत कोल्हे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक राजेंद्र देवरे, पोलीस उप अधिक्षक सचिन सांगळे, वरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील काळे, बोदवडच्या नगराध्यक्षा मुमताज बी. सय्यद बागवान आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. कराळे पुढे म्हणाले की, देशात दरवर्षी चार ते साडेचार लाख अपघात हे फक्त वाहतुक नियमांचे पालन न केल्यामुळे होत असतात. त्यात दीड लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होतो. तर अनेक व्यक्ती जायबंदी होतात, मरणयातना भोगत असतात. जळगाव जिल्ह्यातही रस्ते अपघातात दरवर्षी चारशेपेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यु होतो. परंतु तरीही सुध्दा आपण वाहतुक नियमांचे पालन करीत नाहीत, इतके आपण सगळे भावनाशून्य झालो आहोत काय असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला. काही व्यक्ती ह्या स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाही यासाठी शासनाने वाहतुकीचे नियम केले असून या नियमांची जनजागृती व्हावी, यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. परंतु अशा अभियानाची गरज का निर्माण होते याचा कोणीही विचार करत नाही याचे आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय संस्कृतीबद्दल जगात नितांत आदर आहे. परंतु वाहतुक नियमांच्या उल्लंघनाबाबत परदेशी नागरीक आपल्याला नाव ठेवतात ही खेदाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. अपघातात कर्ता पुरुषाचा मृत्यु झाला तर त्याचे कुटूंब उघड्यावर तर पडतेच. त्याचबरोबर राष्ट्राचेही नुकसान होते. याकरीता नागरीकांनी आपले जीवन लाख मोलाचे आहे याची जाणीव ठेवावी. व त्याची सुरक्षितता जपावी याकरीता वाहन चालविताना मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असतो याची जाणीव ठेवावी तसेच हे अभियान त्या कालावधीपुरते मर्यादित न राहता नागरीकांनी वर्षभर नियमांचे पालन करावे असे आवाहनही श्री. कराळे यांनी केले.
याप्रंसगी आमदार सुरेश भोळे म्हणाले की, अधिकारी हे शासन व जनतेमधील दुवा असतात. याकरीता अधिकाऱ्यांना नागरीकांना शासनाच्या योजनांची तसेच नियमांची माहिती होण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर समाज म्हणून नागरीकांनीही आपली जबाबदारी ओळखून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. विशेषतऱ् रिक्षा चालकांना या नियमांची माहिती होणे आवश्यक आहे. तसेच वाहन परवाना घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस एक झाड लावण्याची विनंती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियानाची पार्श्वभूमी सांगतानाच परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच परिवहन विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात आल्या असून संगणकीय वाहन चाचणी घेणारे जळगाव परिवहन कार्यालय हे राज्यातील दुसरे कार्यालय असल्याचे आवर्जून सांगितले. याप्रसंगी वरणगावचे नगराध्यक्ष व महापौर ललीत कोल्हे आणि राजेंद्र देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. याप्रसंगी परिवहन कार्यालयाने रस्ता सुरक्षेसंदर्भात तयार करण्यात आलेल्या हेल्मेट वापरणे हे डोक्याचे काम आहे या मार्गदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी विनोद ढगे यांच्या चमूने पथनाट्याच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा संदर्भात प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. राजेंद्र देशमुख यांनी तर उपस्थितांचे आभार परिवहन निरिक्षक श्री. मोरे यांनी मानले. या कार्यक्रमास परिवहन, एसटी महामंडळ, वाहतुक शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच वाहन प्रशिक्षण संस्था, वाहतुक युनियन, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. या अभियाना कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
000
No comments:
Post a Comment