जळगाव,
दि. 10 - विविध कारणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुंटूंबियांना आर्थिक
मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या समितीपुढे एकूण 16
प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी आठ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. सात प्रकरणे
अपात्र ठरविण्यात आली, एका प्रकरणात फेर चौकशी करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या आठ
शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देणेबाबतचा निर्णय घेण्यात
आला.
या बैठकीत
ज्ञानेश्वर गुलाब मालचे (भिल),
पिंपळे ता. धरणगाव, भिकन कौतिक
पाटील, चुंचाळे ता. चोपडा,
जगन्नाथ कृष्णाजी चौधरी, हरताळे ता. मुक्ताईनगर, सुभाष ताराचंद पाटील, जवखेडे ता.
अमळनेर, राकेश
उर्फ विलास पुंडलिक पाटील, रा. शिरसोली प्र.बो. ता. जळगाव, समाधान सकरु राठोड, रा.
मोराड ता. जामनेर, ज्ञानेश्वर
देवराम पाटील, शिरसोली प्र.बो. ता. जळगाव, रविंद्र उर्फ रावण भगवान पाटील, रा. जोगलखेडे ता. पारोळा यांना आर्थिक मदत देणेबाबतचा निर्णय
घेण्यात आला.
०००
No comments:
Post a Comment