Wednesday, 4 April 2018

आधारभुत किंमत खरेदी योजनेतंर्गत कडधान्य खरेदीपोटी जिल्ह्यातील 2107 शेतकऱ्यांच्या खाती 10 कोटी रुपये जमा

2 हजार 107 शेतक-यांकडून 18 हजार 795 क्विंटल कडधान्य खरेदी
3 हजार 734 शेतक-यांकडून 42 हजार 364 क्विंटल तूर खरेदी
1 हजार 71 शेतकऱ्यांचा 51 हजार 321 क्विंटल मका खरेदी
206  शेतकऱ्यांची 4 हजार 334.50 क्विंटल ज्वारी खरेदी
49 शेतक-यांकडून 486.50 क्विंटल चणा खरेदी
      जळगाव, दि. 4 - शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2017-2018 मध्ये नाफेडच्यावतीने मार्केटिंग फेडरेशनकडून जिल्ह्यातील तीन खरेदी केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन भरडधान्य खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये मुग 2 हजार 920.50 क्विंटल, उडीद 15 हार 208.50 क्विंटल, व सोयाबीन 666 क्विंटल अशी एकूण 18 हजार 795 क्विंटल कडधान्याची खरेदी जिल्हयातील 2 हजार 107 शेतक-यांकडून करण्यात आली आहे. खरेदीची सर्व रक्कम 10 कोटी 7 लाख 33 हजार 793 रुपये ऑनलाईन पध्दतीने शेतक-यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आली आहे. अशी माहिती परिमल साळुंखे, जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
     त्याचबरोबर सध्या नाफेडअंतर्गत 9 खरेदी केंद्रावर तूर व 12 खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी सुरु आहे. या सर्व 9 केंद्रावर 8 हजार 598 शेतक-यांची तूर खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी झालेली असून त्यापैकी 3 हजार 734 शेतक-यांकडून 42 हजार 364 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तर 1 हजार 487 शेतकऱ्यांच्या खात्यावर 8 कोटी 27 लाख 3 हजार 205 रुपये ऑनलाईन पध्दतीने वर्ग करण्यात आले आहे.
     तसेच खरीप हंगाम 2017-18 मध्ये शासनाच्या आधारभूत धान्य खरेदी योजनेत जळगाव जिल्ह्यातील 9 केंद्रावर 1 हजार 71 शेतकऱ्यांचा 51 हजार 321 क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. तसेच 206  शेतकऱ्यांची 4 हजार 334.50 क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. अशी एकूण 55 हजार 655.50 क्विंटल भरडधान्याची खरेदी करण्यात आलेली आहे. या खरेदीची रक्कम ऑनलाईन पध्दतीने अदा करण्याचे काम सुरु आहे. हरभरा खरेदीकरीता सर्व 12 उपअभिकर्ता संस्थाना नोंदणीचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1 हजार 356 शेतक-यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. हरभरा खरेदीकरिता जिल्ह्यात भडगाव व रावेर येथे खरेदी सुरु झाली असून 49 शेतक-यांकडून 486.50 क्विंटल चणा खरेदी करण्यात आला आहे.
       सध्या जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची गोदामे भरलेली असली तरी शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये. यासाठी खरेदी केलेला चना व तूर साठवणुकीकरिता सटाणा, जि. नाशिक तसेच नवापूर, जि. नंदुरबार येथे पाठविण्यात येत असल्याचे श्री. साळुंखे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
०००

No comments:

Post a Comment