जळगाव, दि. 9 (जिमाका) : दिव्यांग असणे हे कोणाच्या हातात नाही. मात्र, उपलब्ध साधनांनी एकमेकांना मदत करणे महत्त्वाचे आहे. दिव्यांगांना कृत्रीम अवयवांबरोबर रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, मदत व पुनवर्सन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
चोपडा, जि. जळगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग भारत सरकार यांच्यातर्फे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, जबलपूर यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या एडीआयपी योजनेअंतर्गत आयोजित दिव्यांग आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलताई पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, प्रा. चंद्रकांत सोनवणे, जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्षा मनिषा चौधरी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, घनश्याम अग्रवाल, नरेंद्र पाटील उपस्थित होते. माजी मंत्री एकनाथराव खडसे अध्यक्षस्थानी होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मन प्रबळ असेल सर्व समस्यांवर मात करता येते. दिव्यांगांना साहित्य मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. शिबिर दिव्यांगांना उपयुक्त ठरेल.
चोपडा, जि. जळगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग भारत सरकार यांच्यातर्फे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, जबलपूर यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या एडीआयपी योजनेअंतर्गत आयोजित दिव्यांग आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलताई पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, प्रा. चंद्रकांत सोनवणे, जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्षा मनिषा चौधरी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, घनश्याम अग्रवाल, नरेंद्र पाटील उपस्थित होते. माजी मंत्री एकनाथराव खडसे अध्यक्षस्थानी होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मन प्रबळ असेल सर्व समस्यांवर मात करता येते. दिव्यांगांना साहित्य मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. शिबिर दिव्यांगांना उपयुक्त ठरेल.
जलसंपदा मंत्री श्री. महाजन म्हणाले, दिव्यांगाप्रति राज्य सरकार संवेदनशील आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळत आहे. राज्यात आतापर्यंत ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्याच्या गरजा भागविण्यात येत आहेत. आरोग्य समस्या सोडविण्यासाठी शासन खंबीर आहे. आर्थिक परिस्थिती अभावी अनेक दिव्यांगांना साहित्य उपलब्ध होऊ शकत नाही. अशा रुग्णांना शिबिरे उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी नमूद केले.
माजी मंत्री श्री. खडसे म्हणाले, दिव्यांगांचे जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. अलीकडेच अनाथांच्या बाबतीत चांगला निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे समाज आपल्या बरोबर असल्याची भावना दिव्यांगाच्या मनात निर्माण होते. त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. अशा शिबिरातून दिव्यांगांनी नोंदणी करीत साहित्य मिळवावे. त्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये, असेही त्यांनी नमूद केले.
खासदार श्रीमती खडसे म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या वेळेस अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी एक हजार रुग्णांची नोंदणी झाली आहे. शिबिरात नोंदणी केलेल्या प्रत्येक रुग्णाची तपासणी करण्यात येईल. त्यांना आवश्यक ती कागदपत्रे पुरविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना लवकरच साहित्याचे वितरण करण्यात येईल.
डॉ. अखिलेंद्र मौर्य यांनी सांगितले, शिबिरातील सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर रुग्णांना आवश्यक त्या साहित्याचे वाटप करण्यात येईल. यावेळी अमळनेर, भुसावळ, रावेर, यावल, चोपडा तालुक्यातील रुग्णांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष होते. यावेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री श्री. खडसे म्हणाले, दिव्यांगांचे जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. अलीकडेच अनाथांच्या बाबतीत चांगला निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे समाज आपल्या बरोबर असल्याची भावना दिव्यांगाच्या मनात निर्माण होते. त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. अशा शिबिरातून दिव्यांगांनी नोंदणी करीत साहित्य मिळवावे. त्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये, असेही त्यांनी नमूद केले.
खासदार श्रीमती खडसे म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या वेळेस अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी एक हजार रुग्णांची नोंदणी झाली आहे. शिबिरात नोंदणी केलेल्या प्रत्येक रुग्णाची तपासणी करण्यात येईल. त्यांना आवश्यक ती कागदपत्रे पुरविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना लवकरच साहित्याचे वितरण करण्यात येईल.
डॉ. अखिलेंद्र मौर्य यांनी सांगितले, शिबिरातील सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर रुग्णांना आवश्यक त्या साहित्याचे वाटप करण्यात येईल. यावेळी अमळनेर, भुसावळ, रावेर, यावल, चोपडा तालुक्यातील रुग्णांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष होते. यावेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment