चाळीसगाव, दि. 4 - तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांना व शेतकऱ्यांना विविध योजना, शेतीविषयक संपूर्ण माहिती, शेतीविषयी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन यासह 152 लोककल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून कृषी व महसूल विभागाच्या सहकार्याने दि. 7 ते 10 एप्रिल, 2018 या कालावधीत सिताराम पैलवान मळा, लक्ष्मी नगर, चाळीसगाव येथे शासकीय योजनांची जत्रा, कृषी महोत्सव व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यात प्रथमच होत असलेल्या या अभूतपूर्व व अविस्मरणीय कार्यक्रमांना नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन प्रशासनाच्या व आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
या जत्रेत नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व दाखले एकाचवेळी एकाच ठिकाणी मिळणार आहेत. महिला, गरोदर स्त्री, लहान बालके, शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरीक अशा सर्व नागरिकांसाठी शासन राबवित असलेल्या विविध कल्याणकारी 152 योजनांचा लाभ या जत्रेत देण्यात येण्यात येणार आहे. 40 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याचबरोबर महालॅबतर्फे रक्त तपासणी विनामुल्य करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेती करतांना विज्ञानाचा वापर करुन उत्पन्न कसे वाढवावे याविषयी प्रात्यक्षीक दाखविण्यात येणार आहे. या व अशाप्रकारच्या विविध उपयोगी असलेल्या जत्रेत चार दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिार 7 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, प्रमुख अतिथी म्हणून खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार एकनाथराव खडसे, स्मिताताई वाघ, चंदुलाल पटेल, हरीभाऊ जावळे, संजय सावकारे, सुरेश भोळे, डॉ. सतिष पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, शिरीष चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, पाचोराचे उपविभागीय कृषि अधिकारी नारायणराव देशमुख, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, चाळीसगावचे तहसिलदार कैलास देवरे, चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याध्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत कापूस साधन लागवड तंत्रज्ञान या विषयावर जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे हे मार्गदर्शन करणार आहेत. दु. 2 ते 3 वाजेपर्यंत ग्रामीण, सामाजिक शाश्वत विकास या विषयावर झी 24 तास या वाहिनीचे मुंबईचे संपादक अजित चव्हाण, दुपारी 4 ते 5 वाजता ऊस - लक्ष एकरी 100 टन उत्पादनाचे या विषयावर जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे हे मार्गदर्शन करणार आहेत. सायं. 6 वा. सुयोग नानकर यांचे carrier in Research & Development-Roadmap To Success या विषयावर व्याख्यान होणार असून सायं. 7.30 वा. कविता बागुल व नुपुर कथ्थक क्लासेसच्या विद्यार्थींनींचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
रविवार 8 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 10 वाजता हमखास नफ्याची शेती व कृषी उद्योगातील श्रीमंतीचे रहस्य या विषयावर सुवर्ण कोकण विशेष कार्यशाळा होणार असून यात सुवर्ण कोकण गौरव महाराष्ट्राचा व तंत्रज्ञ चमू चे संचालक सतिष परब हे मार्गदर्शन करणार आहे. या कार्यशाळेस जळगाव जिल्हा बँकेचे संचालक वाडीलाल परशुराम राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती, चाळीसगाव सभापती रविंद्र चुडामण पाटील, उपसभापती महेंद्र सिताराम पाटील, संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजता दुग्ध व्यवसायातील काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर कृषी महाविद्यालय, धुळेचे डॉ. धीरज कणखरे, दुपारी 2 वाजता लिंबू उत्पादनाचे प्रगत तंत्र या विषयावर कृषी महाविद्यालय, धुळेचे डॉ. चंद्रशेखर पुजारी, दुपारी 3 वाजता कांदा उत्पादनाचे प्रगत तंत्र या विषयावर कृषी विज्ञान केंद्र, जळगावचे प्रा. किरण जाधव, दुपारी 4 वाजता शेतकरी गट संकल्पना व उत्पादक कंपनी व्यवस्थापन या विषयावर नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन विलास शिंदे, सायंकाळी 6 ते रात्री 7 वाजेपर्यंत सर्पदंश व प्रथमोपचार या विषयावर चाळीसगावचे राजेश ठोंबरे हे मार्गदर्शन करणार आहेत. रात्री 7 ते 8 या वेळेत अंबाजोगाईचे हेमंत धानोरकर हे खगोल विश्वाची अदभुत दुनिया हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
सोमवार 9 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 10 वाजता विविध शासकीय योजनेअंतर्गत दाखल्यांचे व लाभाचे वाटप, चाळीसगाव तालुक्यातील आदर्श शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी गोठाशेड योजना सोडत राज्याचे महसुल व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन हे असणार आहेत. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील आदि उपस्थित राहणार आहेत. खासदार ए. टी. नाना पाटील, जैविक इंधन उर्जा विभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष एम. के. पाटील, जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांचे सभापती व सदस्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर दुपारी 1 वाजता केळी उत्पादन वाढीचे व निर्यातक्षम तथा प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर जैन इरीगेशन उपव्यवस्थापक डॉ. के. बी.पाटील, दुपारी 2 वाजता रेशीम शेती उत्कृष्ठ जोडधंदा या विषयावर औरंगाबादचे दिलीप हाके, भंडाऱ्याचे रायसिंगजी, दुपारी 3 वाजता कापूस गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन या विषयावर कृषी विज्ञान केंद्र, जळगावचे डॉ. हेमंत बाहेती, दुपारी 5 ते 6 वाजेपर्यंत युवकांसाठी प्रेरणा व करीअर मार्गदर्शन या विषयावर दिपस्तंभ, जळगावचे संस्थापक यर्जुर्वेद महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत. रात्री 7 वाजता सौ. शांतीदेवी चव्हाण पॉलीटेक्नीकचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. रात्री 8 वाजता सत्यपालजी महाराज यांचे ग्रामविकासावर सप्तखंजरी प्रबोधन होणार आहे.
मंगळवार 10 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय योजनांची जत्रा, कृषी महोत्सव व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप खासदार ए. टी. नाना पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील हे राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषदेच्या अध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्ष आशाबाई चव्हाण, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, नगपरिषदेचे गटनेते राजेंद्र चौधरी, नगरपरिषदेचे नगरसेवक हे उपस्थित राहणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांनी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासन व आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
000
या जत्रेत नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व दाखले एकाचवेळी एकाच ठिकाणी मिळणार आहेत. महिला, गरोदर स्त्री, लहान बालके, शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरीक अशा सर्व नागरिकांसाठी शासन राबवित असलेल्या विविध कल्याणकारी 152 योजनांचा लाभ या जत्रेत देण्यात येण्यात येणार आहे. 40 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याचबरोबर महालॅबतर्फे रक्त तपासणी विनामुल्य करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेती करतांना विज्ञानाचा वापर करुन उत्पन्न कसे वाढवावे याविषयी प्रात्यक्षीक दाखविण्यात येणार आहे. या व अशाप्रकारच्या विविध उपयोगी असलेल्या जत्रेत चार दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिार 7 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, प्रमुख अतिथी म्हणून खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार एकनाथराव खडसे, स्मिताताई वाघ, चंदुलाल पटेल, हरीभाऊ जावळे, संजय सावकारे, सुरेश भोळे, डॉ. सतिष पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, शिरीष चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, पाचोराचे उपविभागीय कृषि अधिकारी नारायणराव देशमुख, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, चाळीसगावचे तहसिलदार कैलास देवरे, चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याध्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत कापूस साधन लागवड तंत्रज्ञान या विषयावर जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे हे मार्गदर्शन करणार आहेत. दु. 2 ते 3 वाजेपर्यंत ग्रामीण, सामाजिक शाश्वत विकास या विषयावर झी 24 तास या वाहिनीचे मुंबईचे संपादक अजित चव्हाण, दुपारी 4 ते 5 वाजता ऊस - लक्ष एकरी 100 टन उत्पादनाचे या विषयावर जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे हे मार्गदर्शन करणार आहेत. सायं. 6 वा. सुयोग नानकर यांचे carrier in Research & Development-Roadmap To Success या विषयावर व्याख्यान होणार असून सायं. 7.30 वा. कविता बागुल व नुपुर कथ्थक क्लासेसच्या विद्यार्थींनींचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
रविवार 8 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 10 वाजता हमखास नफ्याची शेती व कृषी उद्योगातील श्रीमंतीचे रहस्य या विषयावर सुवर्ण कोकण विशेष कार्यशाळा होणार असून यात सुवर्ण कोकण गौरव महाराष्ट्राचा व तंत्रज्ञ चमू चे संचालक सतिष परब हे मार्गदर्शन करणार आहे. या कार्यशाळेस जळगाव जिल्हा बँकेचे संचालक वाडीलाल परशुराम राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती, चाळीसगाव सभापती रविंद्र चुडामण पाटील, उपसभापती महेंद्र सिताराम पाटील, संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजता दुग्ध व्यवसायातील काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर कृषी महाविद्यालय, धुळेचे डॉ. धीरज कणखरे, दुपारी 2 वाजता लिंबू उत्पादनाचे प्रगत तंत्र या विषयावर कृषी महाविद्यालय, धुळेचे डॉ. चंद्रशेखर पुजारी, दुपारी 3 वाजता कांदा उत्पादनाचे प्रगत तंत्र या विषयावर कृषी विज्ञान केंद्र, जळगावचे प्रा. किरण जाधव, दुपारी 4 वाजता शेतकरी गट संकल्पना व उत्पादक कंपनी व्यवस्थापन या विषयावर नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन विलास शिंदे, सायंकाळी 6 ते रात्री 7 वाजेपर्यंत सर्पदंश व प्रथमोपचार या विषयावर चाळीसगावचे राजेश ठोंबरे हे मार्गदर्शन करणार आहेत. रात्री 7 ते 8 या वेळेत अंबाजोगाईचे हेमंत धानोरकर हे खगोल विश्वाची अदभुत दुनिया हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
सोमवार 9 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 10 वाजता विविध शासकीय योजनेअंतर्गत दाखल्यांचे व लाभाचे वाटप, चाळीसगाव तालुक्यातील आदर्श शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी गोठाशेड योजना सोडत राज्याचे महसुल व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन हे असणार आहेत. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील आदि उपस्थित राहणार आहेत. खासदार ए. टी. नाना पाटील, जैविक इंधन उर्जा विभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष एम. के. पाटील, जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांचे सभापती व सदस्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर दुपारी 1 वाजता केळी उत्पादन वाढीचे व निर्यातक्षम तथा प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर जैन इरीगेशन उपव्यवस्थापक डॉ. के. बी.पाटील, दुपारी 2 वाजता रेशीम शेती उत्कृष्ठ जोडधंदा या विषयावर औरंगाबादचे दिलीप हाके, भंडाऱ्याचे रायसिंगजी, दुपारी 3 वाजता कापूस गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन या विषयावर कृषी विज्ञान केंद्र, जळगावचे डॉ. हेमंत बाहेती, दुपारी 5 ते 6 वाजेपर्यंत युवकांसाठी प्रेरणा व करीअर मार्गदर्शन या विषयावर दिपस्तंभ, जळगावचे संस्थापक यर्जुर्वेद महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत. रात्री 7 वाजता सौ. शांतीदेवी चव्हाण पॉलीटेक्नीकचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. रात्री 8 वाजता सत्यपालजी महाराज यांचे ग्रामविकासावर सप्तखंजरी प्रबोधन होणार आहे.
मंगळवार 10 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय योजनांची जत्रा, कृषी महोत्सव व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप खासदार ए. टी. नाना पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील हे राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषदेच्या अध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्ष आशाबाई चव्हाण, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, नगपरिषदेचे गटनेते राजेंद्र चौधरी, नगरपरिषदेचे नगरसेवक हे उपस्थित राहणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांनी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासन व आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
000
No comments:
Post a Comment