जळगाव, दि. २३ - पानी फाउंडेशतर्फे दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी राज्याव्यापी जलमित्र मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होऊन जलमित्र व्हावे आणि आपले माती आणि माणसांशी नवीन नातं जोडावे. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज केले.
अभिनेता अमीर खान यांच्या पानी फाऊंडेशनवतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, मनीष पात्रीकर आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील पारोळा व अमळनेर या दोन तालुक्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत या तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावे सहभागी झाली आहे. या स्पर्धेचा शुभारंभ ८ एप्रिल रोजी नगाव खु. येथे करण्यात आला. तसेच २२ एप्रिल रोजी कळमसरे, जवखेडा आणि पाडळसरे या गावांमध्ये जाऊन श्रमदान केल्याचेही त्यांनी सांगितले. जवखेडा गावातील दृश्य हे डोळयांचे पारणे फेडणारे होते असे सांगातानाच या गावात लहान मुलांपासून ते अबालवृध्दांपर्यंत सर्वचजण श्रमदान सहभागी झाले होते. पानी फाऊंडेशनच्यावतीने जलमित्र मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्वजणांनी सहभागी होऊन येत्या १ मे रोजी महाश्रमदानाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नागरीकांना केले.
याप्रसंगी पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सत्यजीत भटकळ म्हणाले की, पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाचे विज्ञान गावागावांपर्यंत पोहोचवायचे आहे. गावात पडणारे पाणी गावातच अडवून, साठवून गावांना पाणीदार बनवायचे आहे. यासाठी येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी गावागावात संवादाची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की, गावागावात संवाद निर्माण झाला तर मनसंधारण होईल आणि त्यामुळेच जलसंधारण यशस्वी होईल. श्रमदार ही जादूची छडी आहे तर वॉटर कप स्पर्धा हे निमित्त असून या स्पर्धांसाठी गावांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणात गावकऱ्यांना जलसंधारणाचे शास्त्र आणि शिस्त शिकविण्यात येत आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून मानवाने केलेला निसर्गाचा ऱ्हास थांबविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. १ मे रोजी महाश्रमदान दिन साजरा करण्यात येणार असून या मोहिमेत शहरातील नागरीकांना सहभागी करुन घेण्याचा उद्देश असून यासाठी जलमित्रसारखा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या मोहिमेत राज्यातील ७५ तालुक्यात श्रमदान केले जाणार आहे. याकरीता नागरीकांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी आखलेल्या जलमित्र या मोहिमेत सहभागी होण्यासाठी https://jalmitrafoundation.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. आतापर्यंत या मोहिमेत १ लाखापेक्षा अधिक नागरीकांनी नोंदणी केल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रात या स्पर्धेत चांगले काम होत आहे. यामागे पारोळा व अमळनेर तालुक्यातील गांवकरी यांची मेहनत, श्रम, त्याग आहे. त्यांना आपल्या सगळयांची साथ लाभल्यास या स्पर्धेतील विजेते गाव हे नक्कीच जळगाव जिल्ह्यातील असेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सुरुवातीस पानी फाऊंडेशनच्या उपक्रमाविषयी व सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेविषयी माहिती देणारी चित्रफित सर्वांना दाखविण्यात आली.
000
अभिनेता अमीर खान यांच्या पानी फाऊंडेशनवतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, मनीष पात्रीकर आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील पारोळा व अमळनेर या दोन तालुक्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत या तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावे सहभागी झाली आहे. या स्पर्धेचा शुभारंभ ८ एप्रिल रोजी नगाव खु. येथे करण्यात आला. तसेच २२ एप्रिल रोजी कळमसरे, जवखेडा आणि पाडळसरे या गावांमध्ये जाऊन श्रमदान केल्याचेही त्यांनी सांगितले. जवखेडा गावातील दृश्य हे डोळयांचे पारणे फेडणारे होते असे सांगातानाच या गावात लहान मुलांपासून ते अबालवृध्दांपर्यंत सर्वचजण श्रमदान सहभागी झाले होते. पानी फाऊंडेशनच्यावतीने जलमित्र मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्वजणांनी सहभागी होऊन येत्या १ मे रोजी महाश्रमदानाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नागरीकांना केले.
याप्रसंगी पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सत्यजीत भटकळ म्हणाले की, पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाचे विज्ञान गावागावांपर्यंत पोहोचवायचे आहे. गावात पडणारे पाणी गावातच अडवून, साठवून गावांना पाणीदार बनवायचे आहे. यासाठी येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी गावागावात संवादाची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की, गावागावात संवाद निर्माण झाला तर मनसंधारण होईल आणि त्यामुळेच जलसंधारण यशस्वी होईल. श्रमदार ही जादूची छडी आहे तर वॉटर कप स्पर्धा हे निमित्त असून या स्पर्धांसाठी गावांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणात गावकऱ्यांना जलसंधारणाचे शास्त्र आणि शिस्त शिकविण्यात येत आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून मानवाने केलेला निसर्गाचा ऱ्हास थांबविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. १ मे रोजी महाश्रमदान दिन साजरा करण्यात येणार असून या मोहिमेत शहरातील नागरीकांना सहभागी करुन घेण्याचा उद्देश असून यासाठी जलमित्रसारखा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या मोहिमेत राज्यातील ७५ तालुक्यात श्रमदान केले जाणार आहे. याकरीता नागरीकांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी आखलेल्या जलमित्र या मोहिमेत सहभागी होण्यासाठी https://jalmitrafoundation.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. आतापर्यंत या मोहिमेत १ लाखापेक्षा अधिक नागरीकांनी नोंदणी केल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रात या स्पर्धेत चांगले काम होत आहे. यामागे पारोळा व अमळनेर तालुक्यातील गांवकरी यांची मेहनत, श्रम, त्याग आहे. त्यांना आपल्या सगळयांची साथ लाभल्यास या स्पर्धेतील विजेते गाव हे नक्कीच जळगाव जिल्ह्यातील असेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सुरुवातीस पानी फाऊंडेशनच्या उपक्रमाविषयी व सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेविषयी माहिती देणारी चित्रफित सर्वांना दाखविण्यात आली.
000
No comments:
Post a Comment