जळगाव दि. 13 :- भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने
साजरा करण्यात आला. या सप्ताहानिमित्ताने अधिकारी, कर्मचारी यांच्या सुप्त गुणांना
वाव देण्यासाठी दैनंदिन कार्यालयीन कामकाज सांभाळून बुद्धीबळ, कॅरम, बॅटमिंटन,
संगीत खुर्ची आदि विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धांचे उद्घाटन उप अभियंता बी. जी. पाटील
यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाखा अभियंता एस. व्ही. चौधरी, टि.एस.गाजरे,
एस.डी.नेमाडे, विभागीय लेखापाल उपलंचीवार व प्रथम लिपीक सौ. आर. एस. बागुल तसेच
म.जी.प्रा.चे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक समता सप्ताहाचा समारोप शनिवार, दि. 14 एप्रिल, 2018 रोजी
सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यर्पण करुन
करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने एका प्रसिद्धी
पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment