जळगाव,
दि . 21 - राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यावर्षी 13 कोटी वृक्षांची
लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्याला 42 लाख 43 हजार वृक्ष
लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील
सर्व यंत्रणांनी ते ज्या ठिकाणी वृक्ष लागवड करणार आहे. त्या ठिकाणाची (लॅण्ड
बॅकेची) माहिती वन विभागास तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
किशोर राजे निंबाळकर यांनी आज दिले.
वृक्ष लागवड मोहिमेची आढावा बैठक आज
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार
पडली. यावेळी त्यांनी वरील निर्देश दिलेत. या बैठकीस जळगाव विभागाचे उप वनसंरक्षक
दिगंबर पगार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उप
मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक
साहेबराव पाटील, यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले की, वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत झाडे
लावण्यासाठी ज्या विभागांकडे स्वत:ची जागा उपलब्ध आहे. त्यांनी आतापासूनच खड्डे
खोदण्याचे काम सुरु करुन ते लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच ज्या ठिकाणी वृक्ष
लागवड करण्यात येणार आहे. त्याठिकाणांची माहिती वन विभागास उपलब्ध करुन द्यावी.
जेणेकरुन त्यांना झाले उपलब्ध करुन देणे सोईचे होईल. त्याचबरोबर ज्या विभागांना
वृक्ष लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यांना बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र
विद्यापीठ व जैन हिल्स येथे वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न
करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावर्षीच्या 13 कोटी वृक्ष
लागवड मोहिमेतंर्गत जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष
लागवडीचे नियोजन करण्यात आले असून ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम
करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना केले.
वृक्ष
लागवड मोहिमेतंर्गत शासनातर्फे देण्यात आलेल्या सुचना तसेच करण्यात आलेल्या
नियोजनाचे सादरीकरण उप वनसंरक्षक श्री. पगार यांनी केले.
000
No comments:
Post a Comment