जळगाव, दि. २ - राज्यातील जलयुक्त शिवार अभियान, जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृध्दी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र अर्जदारास विना अट कर्ज मंजुरीचे पत्र सादर करण्यास १३ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी दिली आहे.
राज्यातील जलयुक्त शिवार अभियान, जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृध्दी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र अर्जदारांना विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र २८ मार्च २०१८ पर्यंत सादर करावयाचे होते. तथापि, अधिकाधिक सुशिक्षित बेरोजगारांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र सादर करण्याकरीता पात्र सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांना १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. उर्वरीत निकष हे पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत.
ज्या पात्र अर्जदारांनी विहित मुदतीत अयोग्य कर्ज मंजुरीचे पत्र सादर केले आहे. अशा सर्व पात्र अर्जदारांना विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र पुन्हा सादर करण्याबाबत अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी त्यांचे ३१ मार्च, २०१८ च्या पत्रान्वये मुख्य व्यवस्थापक/नियंत्रक, राज्यस्तरीय बँकर्स कमिटी (SLBC) यांना कळविले आहे.
तरी जिल्हयातील सर्व पात्र सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी बँकेकडून विना अट कर्ज मंजुरीचे पत्र १३ एप्रिल, २०१८ पर्यंत सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. जाधवर यांनी केले आहे.
000
राज्यातील जलयुक्त शिवार अभियान, जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृध्दी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र अर्जदारांना विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र २८ मार्च २०१८ पर्यंत सादर करावयाचे होते. तथापि, अधिकाधिक सुशिक्षित बेरोजगारांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र सादर करण्याकरीता पात्र सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांना १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. उर्वरीत निकष हे पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत.
ज्या पात्र अर्जदारांनी विहित मुदतीत अयोग्य कर्ज मंजुरीचे पत्र सादर केले आहे. अशा सर्व पात्र अर्जदारांना विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र पुन्हा सादर करण्याबाबत अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी त्यांचे ३१ मार्च, २०१८ च्या पत्रान्वये मुख्य व्यवस्थापक/नियंत्रक, राज्यस्तरीय बँकर्स कमिटी (SLBC) यांना कळविले आहे.
तरी जिल्हयातील सर्व पात्र सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी बँकेकडून विना अट कर्ज मंजुरीचे पत्र १३ एप्रिल, २०१८ पर्यंत सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. जाधवर यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment