जळगाव, दि. 2 - पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिरातंर्गत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानाची मुहूर्तमेढ जळगाव येथून रोवली गेली आहे. या शिबिराच्या माध्यमातून पहिल्याच टप्प्यात 1 हजार 317 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन त्यांना दृष्टि देण्याचे काम करण्यात आले आहे. आजपर्यंत झालेल्या शिबिरांमधील हा एक नवीन उच्चांक आहे. या अभियानातंर्गत दरवर्षी सात लाख रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र साकार करु. असा विश्वास राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.
मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ 23 नोव्हेंबर रोजी जळगावात करण्यात आला. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 23 नोव्हेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत दोन हजार रुग्णांची तपासणी करुन त्यापैकी 1 हजार 317 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिराचा समारोप येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार स्मिताताई वाघ, महापौर ललीत कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, ज्येष्ठ नेत्र शल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, रामेश्वर नाईक यांचेसह शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई येथून आलेली टीम उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मंत्री महाजन म्हणाले की, ज्या रुग्णांची आर्थिक क्षमता नाही अशा रुग्णांवर सर्व प्रकारचे उपचार मोफत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी स्वयंस्फुर्तीने व सामाजिक बांधिलकी जोपासून काम करणाऱ्या सर्व सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले असून या महाविद्यालयाचे काम सुरु झाले आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सुरु होणार असल्याने जिल्हयात मोठया प्रमाणात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जिल्हयात मेडिकल हब सुरु करण्यासही शासनाने मंजूरी दिली आहे. यासाठी चिचोंली शिवारात 100 एकर जमीन घेण्यात आली आहे. याठिकाणी नागरीकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी शासनाने 1500 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. याठिकाणी नागरीकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात शिबिरे घेण्यात येणार आहे. यासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची विशेष नियुक्ती करण्यात येत आहे. राज्यात मोतीबिंदू चे 17 लाखापेक्षा अधिक रुग्ण आहे. या रुग्णांना या आजारापासून लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी दरवर्षी 7 लाख रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरु राहणार असल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले. त्याचबरोबर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद एक वेगळेच समाधान देऊन जातो. रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंदाने सर्वांना एक वेगळीच स्फुर्ती मिळते. मुख्यमंत्र्यांनी या अभियानाची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. ही जबाबदारी पूर्ण करतांना मला जे समाधान मिळणार आहे त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो असे भावोद्गारही मंत्री महाजन यांनी काढले. ही जबाबदारी जरी माझ्यावर असली तरी माझ्यामागे काम करणारी टीम वेगळी असून ही टीमच हे काम करीत असून याचे श्रेय रामेश्वर नाईक, अरविंद देशमुख, मुरली पाटील, पितांबर भावसार यांचेबरोबर या शिबिरात काम करणारे सर्व डॉक्टर, नर्सेस, स्वयंपाकी, साफसफाईवाले या सर्वांचे असून त्यांचे मंत्री गिरीष महाजन यांनी कौतूक केले.
या अभियानात गेल्या 10 दिवसात एकूण 1317 रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये 1286 रुग्णांवर मोतीबिंदूचे तर 31 रुग्णांवर पडद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामधील 50 रुग्णांना दोन्ही डोळयांनी दिसत नव्हते. त्या सर्वांवर बिनटाक्याचे लेन्स् बसवून अगदी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. तसेच या रुग्णांची येत्या 8 डिसेंबर रोजी पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. तर एम्पथी फाऊंडेशनच्यावतीने या सर्वांना 7 जानेवारी रोजी नंबरचे चष्मे अगदी मोफत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच येत्या 8 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात साफसफाई मोहिम राबविण्यात येणार असल्याने या मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही डॉ. लहाने यांनी उपस्थितांना केले. यावेळी आमदार स्मिताताई वाघ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरासाठी आलेले सर्व रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांची जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जैन एरिगेशन यांच्यावतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर या शिबिराच्या आयोजनासाठी लागणाऱ्या विविध सुविधांकरीता एल. के. फाउंडेशन, जी. एम. फाउंडेशन यांच्यासह विविध सामाजिक संस्थाचे सहकार्य लाभले. मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानातंर्गत आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या सर्वांचा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात काही रुग्णांना चष्माचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पिंताबर भावसार यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुरली पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक, जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000
मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ 23 नोव्हेंबर रोजी जळगावात करण्यात आला. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 23 नोव्हेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत दोन हजार रुग्णांची तपासणी करुन त्यापैकी 1 हजार 317 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिराचा समारोप येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार स्मिताताई वाघ, महापौर ललीत कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, ज्येष्ठ नेत्र शल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, रामेश्वर नाईक यांचेसह शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई येथून आलेली टीम उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मंत्री महाजन म्हणाले की, ज्या रुग्णांची आर्थिक क्षमता नाही अशा रुग्णांवर सर्व प्रकारचे उपचार मोफत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी स्वयंस्फुर्तीने व सामाजिक बांधिलकी जोपासून काम करणाऱ्या सर्व सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले असून या महाविद्यालयाचे काम सुरु झाले आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सुरु होणार असल्याने जिल्हयात मोठया प्रमाणात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जिल्हयात मेडिकल हब सुरु करण्यासही शासनाने मंजूरी दिली आहे. यासाठी चिचोंली शिवारात 100 एकर जमीन घेण्यात आली आहे. याठिकाणी नागरीकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी शासनाने 1500 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. याठिकाणी नागरीकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात शिबिरे घेण्यात येणार आहे. यासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची विशेष नियुक्ती करण्यात येत आहे. राज्यात मोतीबिंदू चे 17 लाखापेक्षा अधिक रुग्ण आहे. या रुग्णांना या आजारापासून लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी दरवर्षी 7 लाख रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरु राहणार असल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले. त्याचबरोबर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद एक वेगळेच समाधान देऊन जातो. रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंदाने सर्वांना एक वेगळीच स्फुर्ती मिळते. मुख्यमंत्र्यांनी या अभियानाची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. ही जबाबदारी पूर्ण करतांना मला जे समाधान मिळणार आहे त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो असे भावोद्गारही मंत्री महाजन यांनी काढले. ही जबाबदारी जरी माझ्यावर असली तरी माझ्यामागे काम करणारी टीम वेगळी असून ही टीमच हे काम करीत असून याचे श्रेय रामेश्वर नाईक, अरविंद देशमुख, मुरली पाटील, पितांबर भावसार यांचेबरोबर या शिबिरात काम करणारे सर्व डॉक्टर, नर्सेस, स्वयंपाकी, साफसफाईवाले या सर्वांचे असून त्यांचे मंत्री गिरीष महाजन यांनी कौतूक केले.
या अभियानात गेल्या 10 दिवसात एकूण 1317 रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये 1286 रुग्णांवर मोतीबिंदूचे तर 31 रुग्णांवर पडद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामधील 50 रुग्णांना दोन्ही डोळयांनी दिसत नव्हते. त्या सर्वांवर बिनटाक्याचे लेन्स् बसवून अगदी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. तसेच या रुग्णांची येत्या 8 डिसेंबर रोजी पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. तर एम्पथी फाऊंडेशनच्यावतीने या सर्वांना 7 जानेवारी रोजी नंबरचे चष्मे अगदी मोफत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच येत्या 8 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात साफसफाई मोहिम राबविण्यात येणार असल्याने या मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही डॉ. लहाने यांनी उपस्थितांना केले. यावेळी आमदार स्मिताताई वाघ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरासाठी आलेले सर्व रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांची जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जैन एरिगेशन यांच्यावतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर या शिबिराच्या आयोजनासाठी लागणाऱ्या विविध सुविधांकरीता एल. के. फाउंडेशन, जी. एम. फाउंडेशन यांच्यासह विविध सामाजिक संस्थाचे सहकार्य लाभले. मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानातंर्गत आयोजित करण्यात आलेले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या सर्वांचा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात काही रुग्णांना चष्माचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पिंताबर भावसार यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुरली पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक, जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment