जळगाव,
दि. 14 - गिरणा पाटबंधारे विभाग,
जळगावतंर्गत मन्याड मध्यम प्रकल्पावरील तसेच गिरणा प्रकल्पावरील पांझण डावा कालवा,
जामदा डावा कालावा, जामदा उजवा कालवा व निम्नगिरणा कालव्याव्दारे कालवा प्रवाही,
कालवा उपसा जलाशय उपसा लाभक्षेत्रातील अधिसुचीत नदी, नाले, ओढे यावरुन पाण्याचा
लाभ घेणाऱ्या लाभधारकांना रब्बी हंगामासाठी पाणी मागणी अर्ज सादर करण्यासाठी 20
डिसेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता,
गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिली आहे.
यावर्षी या प्रकल्पात सिंचनासाठी उपलब्ध झालेल्या पाणीसाठयातुन पिण्याच्या
पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरीत उपलब्ध
पाणीसाठयानुसार रब्बी हंगाम 2017-18 मध्ये 28 फेब्रुवारी, 2018 पर्यंत उभी पिके
तसेच विहिरीवरुन तसेच अन्य मार्गाने पाणीपुरवठयाची पर्यायी व्यवस्था असेल अशा
लाभधारकांना कपाशी, ज्वारी, दादर, हा.दुरी, मका, कडवळ, कपाशी, सुर्यफुल, करडई,
भाजीपाला, चारा पिके इ. हंगामी पिकांना सिंचनाच्या उपलब्धतेनुसार सिंचनासाठी
मर्यादीत पाणीपुरवठा करण्याचे ठरविण्यात आलेले आहे.
यासाठी पाणी अर्ज नमुना नं.7, 7अ, व 7 ब चे पाणी अर्जावर मागणी करुन पाणी
अर्ज मागणी करण्यासाठी 20 डिसेंबर, 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. वाढीव
मुदतीत पाणी अर्जावर मागणी करुन पाणी अर्ज पाटशाखेच्या कार्यालयात कार्यालयीन
वेळेत प्रत्यक्ष अगर पोष्टाने जमा करावे. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा
पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment