Friday, 8 December 2017

केंद्रीय अतिरिक्त सचिव जयश्री मुखर्जी यांनी घेतला जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा



           
              जळगाव दि. 8 :-  केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाच्या अतिरिक्त सचिव जयश्री मुखर्जी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला.  जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करतांना त्यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनातर्गत विकास कामे करतांना येणाऱ्या अडचणीची माहिती जाणून  घेतली. 

            प्रारंभी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अतिरिक्त सचिव जयश्री मुखर्जी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर,  जलज शर्मा सहाय्यक जिल्हाधिकारी,निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके मंचावर उपस्थित होते.
              केंद्र सरकारच्या अनेक योजना एकत्र करून राबवल्या जात असतांना देशात 115 जिल्हे हे मागास जिल्हे ठरले आहेत. यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहेत. या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी तसेच जिल्हातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रत्येक जिल्हाकरीता एक केंद्रिय सचिवांची नियुक्ती केली आहे. जळगाव जिल्हयासाठी माहिती व प्रसारण विभागाच्या अतिरिक्त सचिव जयश्री मुखर्जी यांची नियुक्ती केली आहे .
              यासाठी श्रीमती जयश्री मुखर्जी यांचे आज जळगावात आगमन झाले होते. उपस्थितीतांना मार्गदर्शन करतांना मुखर्जी म्हणाल्या की, 2022 -23 पर्यंत केंद्र सरकारचा नवभारत निर्माण करण्याचा संकल्प आहे. हा संकल्प्‍ पुर्ण करतांना  केंद्रीय  योजनांची अंमलबजावणी  करतांना मागे पडलेल्या जिल्हा मध्ये जळगावाचा समावेश झाला आहे.त्यामुळे त्यांनी केंद्र शासनाच्या योजना राबवितांना अधिकाऱ्यांना येत असलेल्या अडचणी मांडण्याचे आवाहन केले. तसेच त्यावर उपाय सुचविण्याचे आवाहन केले. यानंतर त्यांनी आरोग्य, शिक्षण, कृषि, प्रधानमंत्री आवास योजना,  दीनदयाल उपाध्याय  ग्रामीण आरोग्य योजना,  कौशल्य  विकास योजना, बीएसएनएल कनेक्टीव्हीटी, डिजिटल इंडिया आदि योजनाची सद्य स्थिती जाणून घेतली.
            जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी  या विकास योजनांच्या  माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन उपस्थितांना केले.
             जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  यांनी जिल्हाचे विकासकामाचे सादरीकरण केले. या बैठकीस सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
              बैठकीनंतर अतिरिक्त सचिव जयश्री मुखर्जी यांनी रावरे तालुक्यातील पाल या गावी  भेट देवून तेथील  ग्रामपंचायत कार्यालय, आश्रमशाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राची  पाहणी केली.
00000

No comments:

Post a Comment