जळगाव, दि. 16 - स्वातंत्र्य सैनिक
निवृत्तीवेतन योजना-पुनार्विलोकन योजनेखाली अर्जदारांना अर्ज करण्याची 7 जानेवारी
2018 पर्यंत अखेरची संधी शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यादृष्टीने ज्या
अर्जदारांकडे सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णयातील विहित निकषांनुसार
आवश्यक ते पुरावे (मुळ प्रतीत) असतील त्यांनी संबंधित तहसिल कार्यालयात कार्यालयीन
वेळेत अर्ज जमा करावेत.
शासन निर्णयातील निकषांनुसार प्राप्त
झालेले अर्जदारांचे अर्ज कागदोपत्री पुरावे ( मुळ प्रतीतील) तपासणी करुन जिल्हाधिकारी
कार्यालयास विनाविलंब समक्ष प्रसिध्दी रिपोर्ट सह सादर करावेत. या योजनेखाली
कोणीही पात्र अर्जदार यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित तहसीलदार
यांनी घ्यावी. असे जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले
आहे. ०००००
No comments:
Post a Comment