Thursday, 14 December 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन



      जळगाव, दि. 14-  दहावी नंतर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसुचीत जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. या योजनेच्या लाभासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यानी 31 डिसेंबर, 2017 पर्यत अर्ज सादर करावेत. असे आवाहन खुशाल गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी दिली आहे.
       शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी महानगरपालिका, नगरपालिका, एमएमआरडीए, एनआयटी यासारख्या प्राधिकरणाच्या हद्दीपासून 20 किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार असल्याचे श्री. गायकवाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                    ०००००

No comments:

Post a Comment