जळगाव, दि. 22 -
बहूप्रतिक्षेत असलेली जळगावकरांची गेल्या कित्येक वर्षापासूनची विमानसेवेची
प्रतिक्षा आज (23 डिसेंबर रोजी) संपणार आहे. जळगावकरांनी अनेक वर्षापासून पाहिलेले
विमानसेवेचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. उडान कार्यक्रमातंर्गत मुंबई-जळगाव-मुंबई
विमानसेवेचा शुभारंभ राज्याचे महसुल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाममंत्री
(सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील
यांच्या हस्ते दुपारी एक वाजता जळगाव विमानतळावर हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार
आहे.
सामान्य
नागरिकांना विमानप्रवास परवडला पाहिजे. यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांनी एप्रिल 2016 मध्ये केंद्र
शासनाच्यावतीने ‘उडान’ (उडे देश का आम नागरीक- रिजनल कनेक्टीव्हिटी
स्कीम) कार्यक्रम जाहीर केला आहे. केंद्र शासनाच्या या कार्यक्रमाचा लाभ राज्यातील
सर्व प्रमुख शहरांना व्हावा. राज्यातील प्रमुख शहरे विमानसेवेने राज्याच्या
राजधानीबरोबरच सर्व प्रमुख शहरांशी जोडली जावीत. जेणेकरुन राज्याच्या सर्व भागात
विकासाला चालना मिळेल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाने
जाहिर केलेल्या या योजनेला संपूर्ण देशात सर्व प्रथम महाराष्ट्र शासनाकडून
प्रतिसाद देण्याचे ठरविले. आणि त्यानुसार 151 कि.मी. अंतरापासून 800 कि.मी.
पर्यंतचा विमानप्रवास सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
जळगाव येथील विमानतळ गेल्या काही
वर्षापासून तयार असूनही येथून विमानसेवा सुरु नव्हती. जळगाव जिल्ह्यातील व्यापार,
उद्योगाच्या वाढीसाठी विमानसेवा आवश्यक असल्याची बाब जिल्ह्याचे पालकमंत्री ना.
चंद्रकांत दादा पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. यासाठी
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला. त्यानुसार मुख्यमंत्री श्री.
फडणवीस यांनी ‘उडान’ कार्यक्रमात जळगाव चा समावेश केला.
राज्याच्या
सर्वांगीण विकासासाठी जळगाव बरोबरच राज्यातील
अमरावती, गोंदिया, नाशिक, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही विमानतळे ‘उडान’ कार्यक्रमातंर्गत आरसीएस विमानतळे म्हणून
अधिसूचित केली आहेत. अधिसूचित केलेल्या विमानतळांवरुन टप्प्याटप्प्याने आरसीएस
विमानसेवा सुरु होणार आहे. केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यात 128
आरसीएस विमानमार्ग निश्चित केले आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर व नांदेड विमानतळांवरुन मुंबईकरिता आणि नाशिक-पुणे हे मार्ग
निश्चित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हैद्राबाद, कांडला व
पोरबंदर या ठिकाणावरुनही महाराष्ट्रात येणारे आरसीएस विमानमार्ग निश्चित करण्यात
आले आहेत. त्यानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 एप्रिल, 2017 रोजी आरसीएस
उड्डाणांचे उद्घाटन केले. त्यात महाराष्ट्रातील नांदेड-हैद्राबाद या आरसीएस
सेवेचा समावेश होता. ही सेवा ट्रु जेट या विमान कंपनीकडून सुरळीत सुरु आहे. आता
नोव्हेंबर पासून या कंपनीकडून नांदेड-मुंबई ही विमानसेवाही सुरु करण्यात आली आहे.
या विमानसेवांचा दर 1 हजार 420 रुपये ते 3 हजार 500 रुपये या मर्यादेत
विमानप्रवासाच्या अंतरानुसार निश्चित करण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर
येथून सुरु होणाऱ्या आरसीएस विमानसेवा डेक्कन चार्टर्ड या विमान कंपनीने मिळविल्या
आहेत.
मुंबई-जळगाव-मुंबई
विमान सेवेच्या शुभारंभासाठी विशेष अतिथी म्हणून राज्याचे जलसंपदा, लाभक्षेत्र विकास
मंत्री ना. गिरीष महाजन, राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जळगाव
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती
उज्वलाताई पाटील, महापौर ललीत कोल्हे हे उपस्थित राहणार आहेत. तर खासदार ए. टी. नाना
पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. अपुर्व
हिरे, आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सर्वश्री. एकनाथराव
खडसे, डॉ. सतीष पाटील, संजय सावकारे, हरीभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे,
शिरीषदादा चौधरी, उन्मेष पाटील, किशोर पाटील, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी
केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली विमानतळ परिसराची पाहणी
उद्यापासून सुरु होणाऱ्या
मुंबई-जळगाव-मुंबई विमानसेवेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी विमानतळ परिसरात सुरु असलेल्या विविध कामांची पाहणी केली. यावेळी
त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,
उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील, तहसीलदार अमोल निकम, महाराष्ट्र
विमानतळ विकास कंपनीचे जनरल मॅनेजर सी. एस. गुप्ता, श्री. चंद्रा, डेक्कन चार्टड
कंपनीचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.
|
00000
No comments:
Post a Comment