Friday, 15 December 2017

ग्राहकहितास प्राधान्य देणार - राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे


        
जळगाव, दि. 15 - ग्राहकांमध्ये आपल्या हक्काबाबत जनजागृती करुन त्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीमार्फत प्रयत्न सुरु आहे. या समितीच्या माध्यमातून ग्राहकहितास प्राधान्य देणार असल्याची माहिती राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष तथा राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण व. देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

            राज्यात 15 ते 31 डिसेंबरपर्यंत ग्राहक जागरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाबाबत माहिती देताना श्री. देशपांडे हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांचेसह जिल्हा ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.
            श्री. देशपांडे पुढे म्हणाले की, ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्यावतीने ग्राहक संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे व ग्राहकांमध्ये जनजागृती करणे यावर भर देण्यात येत आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार व सल्लगार समितीचे सदसय्‍ यांच्यावतीने ग्राहक मेळावे, जनजागृती मोहिम ग्राहकांचे हित जपणारे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच 24 डिसेंबर रोजी ग्राहक जागरण दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाच्यानिमित्ताने ग्राहक जागृतीचे काम करणारे व ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेमार्फतही जनजागृती मोहिम राबविण्यात येणार असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.
000

No comments:

Post a Comment