जळगाव दि. ३१- अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत असल्याची माहिती खुशाल गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी दिली आहे.
या योजनेसाठी विद्यार्थ्यांना १० वी, १२ वी, पदवी, पदवीका परिक्षेमध्ये ६०टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची मर्यादा ५० टक्के आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील अनूसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशित नसणा-या पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी ठराविक रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपुर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता ३२ हजार रुपये, निवास भत्ता २० हजार रुपये, निर्वाह भत्ता ८ हजार रुपये तर इतर महसुल विभागीय शहरात व उर्वरीत क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता २८ हजार रुपये, निवास भत्ता १५ हजार रुपये, निर्वाह भत्ता ८ हजार रुपये तर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी भोजन भत्ता२५ हजार रुपये, निवास भत्ता १२ हजार रुपये, निर्वाह भत्ता ६ हजार रुपये इतका अनुज्ञेय आहे. या रक्कमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये ५ हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्याना प्रती वर्ष रुपये २ हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना http://sisa.maharashtra .gov.in,http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह तो विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून काढलेले आहे. त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये समक्ष, टपालाव्दारे अथवा कार्यालयाच्या ई मेल वर १५ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावा.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन श्री. गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.
00000
या योजनेसाठी विद्यार्थ्यांना १० वी, १२ वी, पदवी, पदवीका परिक्षेमध्ये ६०टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची मर्यादा ५० टक्के आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील अनूसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशित नसणा-या पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी ठराविक रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपुर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता ३२ हजार रुपये, निवास भत्ता २० हजार रुपये, निर्वाह भत्ता ८ हजार रुपये तर इतर महसुल विभागीय शहरात व उर्वरीत क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता २८ हजार रुपये, निवास भत्ता १५ हजार रुपये, निर्वाह भत्ता ८ हजार रुपये तर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी भोजन भत्ता२५ हजार रुपये, निवास भत्ता १२ हजार रुपये, निर्वाह भत्ता ६ हजार रुपये इतका अनुज्ञेय आहे. या रक्कमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये ५ हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्याना प्रती वर्ष रुपये २ हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना http://sisa.maharashtra .gov.in,http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह तो विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून काढलेले आहे. त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये समक्ष, टपालाव्दारे अथवा कार्यालयाच्या ई मेल वर १५ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावा.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन श्री. गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.
00000