जळगाव दि.24 - औरंगाबाद-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव घाटातील
रस्ता अतिवृष्टिमुळे खचल्याने या मार्गावरील वाहतूक 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत बंद राहणार
असून ही वाहतुक औरंगाबाद-नांदगावमार्गे चाळीसगाव कडे वळविण्यास जिल्हाधिकारी तथा
अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव किशोर राजे निंबाळकर यांनी
मंजूरी दिली आहे.
औरंगाबाद-धुळे या राष्ट्रीय
महामार्गावरील चाळीसगाव घाटातील रस्ता 21 ऑगस्ट रोजी अतिवृष्टिमुळे खचल्याने या
मार्गावरील वाहतुकीत औरंगाबाद- देवगांव रंगारी-शिवूर बंगला-नांदगाव मार्गे
चाळीसगाव असा बदल करण्यात आला आहे. हा रस्ता दुरुस्ती करुन पूर्वव्रत सुरु होईपावेतो
या मार्गावरील वाहतुक बंद करण्यास यापूर्वीच मंजूरी देण्यात आली आहे. अद्याप हा
रस्ता दुरुस्त न झाल्याने या मार्गावरील वाहतुक 31 ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्यास
मंजूरी देण्यात येत असल्याचेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment