Monday, 30 October 2017

पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी- जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर





·       प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी
            जळगाव, दि. 30 - पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी जिल्हयातील नागरीकांबरोबरच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाने आवश्यक ती कार्यवाही करावी. अशा सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्या.
            जिल्हा पर्यावरण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उप वन संरक्षक आदर्शकुमार रेड्डी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे नाशिक येथील प्रादेशिक अधिकारी आर. यु. पाटील, मंडळाचे जळगाव येथील उप प्रादेशिक अधिकारी अ. मा. कारे, समितीचे सदस्य जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांचे प्रतिनिधी तसेच अशासकीय सदस्य अविनाश कुडे आदि उपस्थित होते.
            जिल्ह्यातील नद्यांमध्ये होणारे प्रदुषण रोखण्यासाठी मंडळाने आवश्यक ती पावले उचलावी. तसेच महानगरपालिका, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये होणारे प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम याबाबत जनतेमध्ये जनजागृती करावी. औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषण रोखण्यासाठी मंडळाने कठोर पावले उचलताना संबंधितांना समज देऊनही प्रदुषण रोखले जात नसेल तर प्रसंगी अशा कारखान्यावर दंडात्मक कारवाई करावी. त्याचबरोबर समितीच्या पुढील बैठकीस जिल्हयातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या प्रतिनिधींना पुढील बैठकीस आमंत्रित करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्यात.
0000

No comments:

Post a Comment