जळगाव, दि. 12- पोलीसांना आपले कर्तव्य
पार पाडीत असताना त्यांचा समाजातील सर्व घटकांशी संबंध येत असतो. आजच्या
धकाधकीच्या जीवनात पोलीसांच्या कामाचा व्याप आणि स्वरुप बघता त्यांना आपले शारीरिक
आणि मानसिक स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस
अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केले.
जागतिक
मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा पोलिस दल,
जळगावतर्फे मानसिक स्वास्थ या विषयावर पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात चर्चासत्राचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना
पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे बोलत होते. चर्चासत्राचे उद्घाटन जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधिक्षक
बच्चन सिंह, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सौ. किर्ती देशमुख, चिकित्सक डॉ. दौलत निमसे आदि
उपस्थित होते.
श्री.
कराळे पुढे म्हणाले की, जागतिक आरोग्य् संघटनेच्या अहवालानुसार जगातील 50 टक्के
लोकांना मानसिक त्रास थोड्याफार प्रमाणात असतो. पोलीसांच्या कामाचे स्वरुप बघता
त्यांना आपले मानसिक स्वास्थ टिकवून ठेवणे जिकिरीचे होते. व्यायामामुळे माणसाची
सहनशक्ती व एकाग्रता वाढते. यासाठी पोलीसांनी व्यायामाला प्राधान्य देण्याचे आवाहन
केले.
या
चर्चासत्राच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण
म्हणाले की, दैनंदिन कामामुळे वेळेचे नियोजन बिघडते.नियोजनाच्या अभावामुळे माणसाला
मानसिक थकवा येतो. हा थकवा घालविण्यासाठी योगा करणे आणि वेळेवर संतुलित आहार
घ्यावा. संतुलित आहाराने मानसिक थकवा दूर होत असल्याने पोलीस दलातील अधिकारी,
कर्मचारी यांनी आहाराच्या वेळा पाळण्याचा सल्ला उपस्थितांना दिला.
या
चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणुन डॉ. सौ. किर्ती देशमुख, मानसोपचार तज्ज्ञ,
सामान्य रुग्णालय, जळगाव व डॉ. दौलत निमसे, चिकीत्सक मानसतज्ज्ञयांनी मानसिक
स्वास्थ आणि ताण तणावाचे नियोजन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या
चर्चासत्रास पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी
मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे प्रास्ताविक विलास सोनवणे यांनी केले.
तर सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार पोलीस नाईक विनोद अहिरे यांनी मानले.
०००००
No comments:
Post a Comment