जळगाव, दि. 27 - येत्या 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा
जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस तर स्व.
इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार
आहे.
यानिमित्ताने
शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये दिली.
राष्ट्रीय
एकता व राष्ट्रीय संकल्प दिवसानिमित्ताने कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या
बैठकीस उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, जिल्हा
उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा क्रीडा
अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, उप कार्यकारी अभियंता पी. ए. ठोसर, परिवहन विभागाचे
अधिकारी विकास बऱ्हाटे, सहाय्यक अधिक्षक अभियंता आय.एस.पठाण आदि उपस्थित होते.
या
दिवसानिमित्ताने 31 रोजी सकाळी 6 वा. 45
मि.नी. काव्यरत्नावली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापर्यंत एकता दौड
होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वा.
प्रत्येक कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे
पुजन करण्यात येणार असून सायंकाळी साडेपाच
वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात तत्सम
यंत्रणांचे पथसंचलन होणार असल्याची माहिती
बैठकीमध्ये देण्यात आली.
00000
No comments:
Post a Comment