जळगाव,दि.7:- प्रधानमंत्री पीक विमा
योजना खरीप हंगाम 2017 मध्ये राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक
सुचनेनुसार योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती संबंधित बँकांनी केंद्र
शासनाच्या www.agri-insurance.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक करणेत आले
आहे. सदर संकेतस्थळ हे 14 ऑक्टोबर 2017 पर्यंतच सुरु राहणार असून त्यानंतर शेतकरी
सहभागाची माहिती अपलोड करता येणार नाही. संकेतस्थळावर अपलोड झालेल्या शेतकरी
सहभागाची माहिती फक्त केंद्र व राज्य शासनाचे विमा हप्ता अनुदान अदा करण्यास ग्राह्य
धरली जाणार असून त्यानुसार संबंधित विमा कंपनीकडून सुद्धा नुकसान भरपाईसाठी
विचारात घेतली जाणार आहे.
तरी
सर्व संबंधित बॅकांनी योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती 14 ऑक्टोबर 2017
पूर्वी संकेतस्थळावर अपलोड करावी. याबाबत बँकांकडून दिरंगाई झाल्यास व शेतकऱ्यांना
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नुकसान भरपाई देय झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी
बँकेची राहणार आहे. याच अनुषंगाने कृषि विमा पोर्टलवर अपलोड केलेली यादी बॅकांनी
विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे माहितीसाठी प्रदर्शित
करावी जेणे करुन शेतकऱ्यांना यादीमध्ये नावाची, खात्री करता येईल असे कृषि विभाग
महाराष्ट्र राज्य यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment