Monday, 23 October 2017

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 969 दलघमी उपयुक्त पाणीसाठा




        हतनूर, अभोरा, मंगरुळ, सुकी प्रकल्पात 100 टक्के तर गिरणा व वाघूर मध्ये 72 टक्के उपयुक्त साठा

जळगाव, दि. 23 - जिल्ह्यात असलेल्या तीन मोठे, तेरा मध्यम व शहाण्णव लघु प्रकल्पांमध्ये आजपर्यंत एकूण 968.93 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. या उपयुक्त साठ्याची टक्केवारी एकूण उपयुक्त साठ्याच्या 67.88 टक्के इतकी आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर 96 लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे. 
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी इतका असून आजअखेर हतनूर प्रकल्पात 255 दलघमी, गिरणा 375 दलघमी, तर वाघूर 179.80 दलघमी याप्रमाणे या प्रकल्पांमध्ये एकूण 810.28 दलघमी म्हणजेच 10.85 टीएमसी उपयुक्त साठा आहे. याची टक्केवारी हतनूर 100, गिरणा 71.72 तर वाघूर 72.34 टक्के इतकी आहे.
तसेच जिल्ह्यातील एकूण तेरा मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 203.91 दलघमी म्हणजेच 7.20 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 109.86 दलघमी म्हणजेच 3.88 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. यामध्ये मंगरुळ, सुकी, अभोरा या प्रकल्पांमध्ये 100 टक्के तर तोंडापूर प्रकल्पात 81.41 टक्के, गुळ प्रकल्पात 78.77 टक्के तर मोर प्रकल्पात 64.20 टक्के उपयुक्त साठा आहे. तर जिल्ह्यातील एकूण 96 लघू प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 196.50 दलघमी म्हणजेच 6.93 टीएमसी इतका असून आजअखेर या प्रकल्पांमध्ये 48.79 दलघमी म्हणजेच 1.72 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
            1 जून 2017 पासून हतनूर धरणाच्या क्षेत्रात 513 मिमी, गिरणा धरण क्षेत्रात 581 मिमी तर वाघूर धरण क्षेत्रात 489 मिमी इतका पाऊस पडला आहे. सध्या हतनूर धरणातून 3390 व्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असून यामुळे धरणाचे 2 गेट अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे.
000

No comments:

Post a Comment