जळगाव दि.26- रब्बी हंगामातील
भाजीपाला, ज्वारी, हरभरा, गहू, दादर, कपाशी, चाऱ्याची पिके, अन्नधान्य, भूसार
पिकांसाठी लघु पाटबंधारे जळगावच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठ्यातून 28
फेब्रुवारी 2018 पर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील
शेतकऱ्यांनी आपल्या भागातील शाखाधिकारी यांच्या शाखा कार्यालयात 31 डिसेंबर, 2017
पावेतो पाणी अर्ज पाठविण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग
यांनी केले आहे.
मोठा प्रकल्प हतनूर जलाशय, हतनूर कालवा
कि.मी. 0 ते 92 पर्यंत व सुकी, अभोरा, तोंडापूर, मोर या मध्यम प्रकल्पावरील
कालव्याच्या वितरिकेवर प्रवाही जलाशय, नदी नाले व कालव्यावर उपसा सिंचनाने
पाण्याचा लाभ घेणा-या सर्व लाभधारकांना रब्बी हंगाम 2017-2018 करीता नविन उपलब्ध
होणा-या पाणी साठ्यानुसारच पाणी अर्ज मंजुर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी रब्बी
हंगाम 2016-2017 पर्यंतची थकबाकी पुर्ण भरावी. असे कार्यकारी अभियंता, जळगाव
पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment