·
फवारणी करताना
फवारणी किट वापरावे.
·
ऑक्टोबर
महिन्यातील वाढते तापमान लक्षात दुपारी फवारणी करण्याचे टाळावे.
·
विक्रेत्यांनी
किटकनाशक वापराबाबतची माहिती शेतकऱ्यांना द्यावी.
जळगाव, दि. 10 - पीकांवर किटकनाशकांची
फवारणी करताना शेतकऱ्यांनी फवारणी किट वापरावे. तसेच वाढत्या तापमानात विषबाधा
होण्याची शक्यता जास्त असल्याने शेतकऱ्यांनी पीकांची फवारणी दुपारच्या वेळेत न
करता शक्यतो सकाळच्यावेळीच करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
यांनी केले आहे.
कापुस
आणि सोयाबीन पीकावर किटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकरी व शेतमजुन यांना होणाऱ्या
विषबाधेबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. या
बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, आत्मा चे प्रकल्प संचालक शिवाजीराव आमले, कृषि
उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषि अधिकारी गोरम लोखंडे, नारायण देशमुख, जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी मधुकर चौधरी,
सीडस् असोसिएशनचे अध्यक्ष विनोद तराळ यांचेसह तालुका कृषि अधिकारी, कृषि
विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि किटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यात
सर्वाधिक कापुस लागवडीखालील क्षेत्र जिल्हयात असल्याने फवारणी करतांना शेतकऱ्यांनी
काळजी घेणे आवश्यक असून फवारणीच्यावेळी मास्क, हॅन्डग्लोज चा वापर करावा. तसेच
अनेक किटकनाशक कंपन्यांनी केमिकल प्रुप फवारणी किट तयार केले आहे. या किटचा वापर
केल्यास विषबाधेचा धोका टाळता येतो. काही किटकनाशक हे विषारी असल्याने त्याचा वापर
करण्याबाबत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या सुचनाही
जिल्हाधिकाऱ्यांनी किटकनाशक विक्रेत्यांना दिल्यात. शेतकऱ्यांनी किटकनाशकाचा वापर
केल्यानंतर रिकाम्या बाटल्या तसेच इतर वस्तु उघडयावर टाकू नये. ठिबकमार्फत पिकांना
किटकनाशक देताना योग्य ती काळजी घेण्यात यावी. शेतकऱ्यांनी पिकांना फवारणी केल्यानंतर
हात स्वच्छ धुतल्यानंतरच जेवण करावे. विषबाधेची लक्षणे आढळून आल्यास अशा व्यक्तीला
तातडीने रुग्णालयात दाखल करावेत. ऑक्टोबर महिन्यात तापमानात वाढ होत असल्याने
दुपारच्यावेळी तर सायंकाळी वाऱ्याचा वेग वाढत असल्याने सायंकाळी फवारणी न करता ती
सकाळच्याच वेळी करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना केले.
एप्रिलपासून
जिल्हयात 161 जणांना विषबाधा झाली तर 4 व्यक्तींचा मृत्यु झाल्याची माहिती कृषि
विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. फवारणीमुळे विषबाधा होवू नये, तसेच
यावेळी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही
जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि विभाग, किटकनाशक कंपनीचे प्रतिनिधी तसेच विक्रेते यांना
दिल्यात.
000
No comments:
Post a Comment