जळगाव, दि. १७ - राष्ट्रीय बांबू
अभियानातंर्गत ग्रामीण भागात बांबू शेतीला प्रोत्साहन मिळून खाजगी जमिनीवर बांबू
लागवड वाढावी. यासाठी जळगाव येथे १ ऑक्टोबर, २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, नॅशनल बांबू मिशन कार्यकारी समितीचे अध्यक्ष एम.
के. अण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बांबू शेती कार्यशाळा आयोजित करण्यात
येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
बांबू शेती कार्यशाळेच्या
पूर्वतयारीकरीता येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात नॅशनल बांबू मिशन कार्यकारी
समितीचे अध्यक्ष एम. के. अण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या
बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. टी. एस. के.
रेड्डी, मुख्य वनसंरक्षक (प्रा) धुळेचे टी. एन. साळुंखे, इंडियन फेडरेशन ॲन्ड
ग्रीन एनर्जीचे संचालक संदिप ढेंग, जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, उप
वनसंरक्षक यावलचे प्रकाश मोराणकर,उप वनसंरक्षक नाशिक श्री. शिवबाला, जिल्हा नियोजन
अधिकारी दिनेश वाघ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, विभागीय वन अधिकारी
बी. एच. पाटील, श्री. श्री. रनाळकर, श्री. जेजूरकर, जिल्हा उद्योग केंद्राचे
महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी
यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील वनेतर क्षेत्रात, शेतीच्या बांधावर, पडीक
शेती क्षेत्रात व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड होऊन शेतीपूरक जोडधंदा
किंवा व्यवसाय उपलब्ध व्हावा, त्यातून उत्पन्नाचे साधन विकसित व्हावे, बांबूचे मूल्यवर्धन
व्हावे, त्यातून स्थानिकांना रोजगार मिळावा व एक चांगली बाजारपेठ तयार व्हावी याकरिता
शासन विविध उपाययोजना राबवित आहे.
बांबू
ची शेती ही पडीक जमिनीवर व कमी पाण्यात करता येत असल्याने खान्देशात बांबू लागवडीस
प्रोत्साहन मिळावे यासाठी अनेक सोईसुविधा उपलब्ध करुन देत आहे. याबाबतची माहिती शेतकऱ्यांना
व्हावी. यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील अंदाजे एक हजार शेतकऱ्यांना या कार्यशाळेस
आमंत्रित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील कृषि व
वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या जिल्ह्यातील बांबू शेती करणारे,
करु ईच्छिणारे शेतकरी यांची या कार्यशाळेस निवड करुन कार्यशाळेस उपस्थित राहण्यास प्रोत्साहित
करण्याच्या सूचना द्याव्यात. अशी सुचना नॅशनल
बांबू मिशन कार्यकारी समितीचे अध्यक्ष एम. के. अण्णा पाटील यांनी बैठकीत संबंधित
विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
संपूर्ण जगामध्ये बांबूच्या एकंदर 1200
प्रजाती असून त्यापैकी भारतात 128 प्रजाती आढळतात. बांबू संसाधनामध्ये भारत जगामध्ये
दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 13 टक्के क्षेत्र हे बांबू क्षेत्र
आहे. देशात बांबूची बाजारपेठ सुमारे 30 हजार कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा
हिस्सा मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन बांबूक्षेत्राच्या विकासाच्या
अनुषंगाने वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. यामध्ये
खाजगी जमिनीवर बांबू लागवडीस प्रोत्साहन देणे याचा समावेश असून याकरीता या कार्यशाळेचे
आयोजन करण्यात येत असल्याचे श्री. रेड्डी यांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीत कार्यशाळेच्या आयोजनाकरीता करावयाचे
नियोजन व इतर बाबींवर चर्चा करण्यात आली.
000
No comments:
Post a Comment