जळगाव,
दि. 14- गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक
आजार आहे. जो मुख्यत: मुलांना होतो. सन 2018
च्या आकडेवारीनुसार गोवर आजारामुळे जवळपास 4 कोटी 92 लाख 1 हजार 800 मुले संपूर्ण भारतामध्ये
दरवर्षी मुत्यू मुखी पडतात.
रुबेला
हा त्या मानाने सौम्य संक्रमक आजार आहे. जो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींना देखील
होतो. परंतू जर गर्भवती स्त्रियांना रुबेला या आजाराचा संसंर्ग झाला तर यामुळे
अचानक गर्भपात किंवा जन्मजातदोष (जसेकी अंधत्व, बहिरेपणा आणि हदय विकृती) होऊ
शकतो. हे बालक जन्मजात रुबेला सिड्रोम (सिआरएस) म्हणुन ओळखले जाते. असे बालक त्या
महिलेच्या कुटूंबासाठीच नव्हे तर समाजासाठी सुद्धा ओझे लादल्यासारखे आहे.
भारत
सरकारने सन 2018 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे
नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी भारत सरकार टप्प्याटप्याने गोवर
रुबेला ही लस विविध राज्यामधील नियमित लसीकरण कार्यक्रमामध्ये समाविष्ट करीत आहे.
त्यानुसार नोव्हे 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर लसीकरण मोहीम आयोजित
करण्याचे ठरविण्यात आले आहे. या मोहीमे अंतर्गत राज्यामध्ये 9 महिने ते 15
वर्षापर्यंत वयोगटातील जवळपास 3.7 कोटी लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारीत केले आहे.
यापैकी काही लाभार्थ्यांना जरी या अगोदर गोवर रुबेला लस दिली असेल, तरी त्यांना हा
अतिरिक्त डोस द्यावयाचा आहे.
या
मोहिमेसाठी निर्धारित करण्यात आलेल्या
वयोगटातील ( 9 महिने ते 15 वर्षापर्यत ) एकूण लाभार्थ्यांपैकी 60-65 टक्के
लाभार्थी हे शाळेत जाणारे आहेत. गोवर रुबेला लसीकरण मोहिम शुभारंभ झाल्यानंतर
किमान 4-5 आठवडयांच्या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. या अंतर्गत आरोग्य
विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाडी व उपकेंद्रामध्ये पहिल्या तीन
आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. नियमित लसीकरण सर्व आरोग्य संस्था
व लसीकरण सत्राच्या ठिकाणी करण्यात येईल.
असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये
कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment