जळगाव, दि. 22 - पंतप्रधान पीक विमा
योजनेतंर्गत रब्बी हंगाम 2017-2018 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतिम मुदत
1 जानेवारी 2018 असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ
घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गंत - नैसर्गिक आग, वीज
कोसळणे, पूर, चक्री वादळ, भूस्खलन, गारपीट, पावसातील खंड, कीड व रोग या आपत्तीमुळे
होणारे नुकसान या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजना
बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. नुकसान भरपाई कृषि आयुक्तालयामार्फत
पीक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेतलेले पिक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेच्या सरासरी
आकडेवारीवर आधारित आहे. जोखीम स्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात
आला आहे. उभ्या पिकांबरोबरच काढणी झालेल्या पिकांसाठी सर्वसामान्य काढणी/कापणी
झाल्यानंतर अधिसुचित पिकांचे नुकसान झाल्यास जास्तीत जास्त 15 दिवस नुकसान भरपाईस
पात्र राहील.
विमा
हप्ता दर व विमा संरक्षित रक्कम -
या योजनेमध्ये प्रती हेक्टरी रब्बी ज्वारी (बागायत) 130 रुपयात 26 हजार
रुपयांचे विमा संरक्षण, ज्वारी (जिराईत) 360 रुपयात 24 हजार रुपयांचे विमा
संरक्षण, गहू (बागायत) 495 रुपयात 33 हजार रुपयांचे विमा संरक्षण, हरभरा 360 रुपयात 24 हजार रुपये, उन्हाळी भुईमुग
184 रुपयात 36 हजार रुपयांचे तर कांदा पीकासाठी 3 हजार रुपयात 60 हजार रुपयांचे
विमा संरक्षण मिळणार आहे.
योजनेच्या अधिक माहिती व संपर्कासाठी आपल्या
तालुक्यातील नजीकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बॅक,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव
यांनी केले आहे,
०००००
No comments:
Post a Comment