जळगाव, दि. 28 - ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या सुधारित तरतुदीनुसार
अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापैकी 50 टक्के पदे
महिलांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील चोपडा, यावल व रावेर या अनुसुचित क्षेत्रातील एकुण 28
ग्रामपंचायतीची आहेत. या ग्रामपंचायतीची सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित करणेसाठी 30
नोव्हेंबर, 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सोडत काढण्यात
येणार आहे.
या सोडत कार्यक्रमास चोपडा, यावल व
रावेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व
नागरीकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले
आहे.
०००००
No comments:
Post a Comment