जळगाव, दि. 10 :- शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत
जिल्हयास दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आतापासून नियोजन
करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्या. राज्याच्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत
जिल्ह्यास दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक संपन्न
झाली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी वनविभागाचे उप वनसंरक्षक एम.
आदर्शकुमार रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांचेसह विविध
शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर पुढे
म्हणाले की, येत्या पावसाळ्यात मोठ्या
प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी ग्रामपंचायत, अंगणवाड्या, प्राथमिक व
माध्यमिक शाळा, समाजकल्याण विभागाच्या
आश्रमशाळा, वसतीगृह, आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाने, कृषी कार्यालये
यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेनुसार नियोजन करावे. वृक्ष लागवड करतांना
झाडाची मुळे तुटली तर त्यास वाढण्यास वेळ लागतो. यासाठी वन विभागाने सर्व अधिकारी
व कर्मचारी यांना वृक्ष लागवड करण्याचे
प्रशिक्षण द्यावे. वृक्ष लागवड हा राष्ट्रीय उपक्रम असल्याने यासाठी सर्व
रोपे विनामुल्य पुरविण्यात येणार आहेत.
सर्व शासकीय
अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीची सविस्तर माहिती वनविभागाकडे सादर करावी अशा सुचनाही
त्यांनी यावेळी दिल्या.
0000
No comments:
Post a Comment