जळगाव, दि 14 - वाघूर धरण विभाग,
जळगाव अंतर्गत वाघूर प्रकल्पावरुन उजवा व डावा कालाव्याव्दारे कालवा प्रवाही,
कालवा उपसा, लाभक्षेत्रातील अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरुन उपसा सिंचनाने तसेच
लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील विहिरीवरुन पाण्याचा लाभ घेणा-या सर्व
लाभधारकांसाठी वाघूर प्रकल्पात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झालेला आहे. पिण्याच्या
पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरित उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगाम 2017-18 मध्ये
दि. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2017 या मुदतीत रब्बी कपाशी, गहू, हरभरा, दादर,
मका, कडवाळ, सूर्यफूल, भाजीपाला विहीरीवरील उभे पिके इत्यादी हंगामी पिकांना
सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आलेले आहे.
लाभधारकांनी
अटींच्या पुर्ततेसह नमुना नं. 7, 7 अ व 7 ब चे पाणी अर्जावर मागणी करुन पाणी अर्ज
30 डिसेंबर, 2017 च्या आत संबंधीत उपविभागीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत
प्रत्यक्ष अगर पोस्टाने द्यावे.
उन्हाळी
हंगाम 2015-16, रब्बी हंगाम 2016-17 व उन्हाळी हंगाम 2016-17 ची थकबाकी व त्या
अगोदरची थकबाकी सुधारित दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील. असे उप
कार्यकारी अभियंता, वाघूर धरण विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment