जळगाव, दि. 9 :-
महानगरपालिकेला शासनाकडून मिळालेल्या 25 कोटी रुपये निधीतून शहराच्या विकास कामांना प्राधान्य द्यावेत. अशी सुचना महसूल,
मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत
पाटील यांनी केली.
जळगाव शहरात विकासाची
कामे होण्यासाठी शासनाने महानगरपालिकेस 25 कोटी रुपयांचा निधीतून उपलब्ध करुन दिला
आहे. या निधीच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांना प्राधान्य देण्यात यावे व ती
वेळेत पूर्ण करावीत. शासनाने दिलेल्या निधीतून करावयाच्या कामांचा आढावा
घेण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात
बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.
बैठकीस खासदार ए. टी.
नाना पाटील, महापौर ललीत कोल्हे, आमदार चंदुलाल पटेल, आमदार स्मिताताई वाघ, आमदार
सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचेसह महापालिकेचे
अधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिवाजी नगर उड्डाण
पुल, बजरंग पुलाजवळ उड्डाण पुल तयार करणे, शहरात एल.ए.डी. लाईट लावणे, वाढीव भागात
भूयारी गटारी करणे तसेच इतर विकासात्मक कामे करणे आदी विषयावर या बैठकीत चर्चा
करण्यात आली.
000
No comments:
Post a Comment