जळगाव दि. 6 :- भू-विकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांकरीता एक रक्कमी कर्ज परतफेड (ओ.टी.एस.) योजना लागू केलेली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज परतफेडीसाठी 31 मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर सक्तीच्या वसुलीद्वारे जमीन लिलाव करुन वसुलीची कार्यवाही केली जाणार असल्याचे विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव जिल्हा भु-विकास बँकेचे जिल्ह्याअंतर्गत 234 सभासदांकडे एकूण 6 कोटी 46 लाख रुपये येणे आहे. ही रक्कम वसुलीसाठी शासनामार्फत एक रक्कमी तडजोड (वनटाईम सेटलमेंट ओ.टी.एस.) योजनेचा मार्ग काढण्यात आलेला आहे. या योजनेमध्ये सन 2004 चे मुद्दल रक्कमेवर 6 टक्के दराने सरळ व्याज आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील बँकेच्या सभासदांकडून 1 कोटी 74 लाख रुपये वसुली होईल व 4 कोटी 72 लाख रुपये शेतकऱ्यांना व्याज माफी मिळणार आहे.
शासनाने जाहिर केलेल्या एक रक्कमी कर्ज परतफेड योजनेाचा जास्तीत जास्त कर्जदार सभासदांनी लाभ घेऊन 31 मार्च 2018 च्या आंत कर्जाची परतफेड करावी. व आपल्या शेतजमिनीवरील बँकेचा बोजा कमी करुन घेण्याबाबत श्री. जाधवर यांनी आवाहन केले आहे.
00000
जळगाव जिल्हा भु-विकास बँकेचे जिल्ह्याअंतर्गत 234 सभासदांकडे एकूण 6 कोटी 46 लाख रुपये येणे आहे. ही रक्कम वसुलीसाठी शासनामार्फत एक रक्कमी तडजोड (वनटाईम सेटलमेंट ओ.टी.एस.) योजनेचा मार्ग काढण्यात आलेला आहे. या योजनेमध्ये सन 2004 चे मुद्दल रक्कमेवर 6 टक्के दराने सरळ व्याज आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील बँकेच्या सभासदांकडून 1 कोटी 74 लाख रुपये वसुली होईल व 4 कोटी 72 लाख रुपये शेतकऱ्यांना व्याज माफी मिळणार आहे.
शासनाने जाहिर केलेल्या एक रक्कमी कर्ज परतफेड योजनेाचा जास्तीत जास्त कर्जदार सभासदांनी लाभ घेऊन 31 मार्च 2018 च्या आंत कर्जाची परतफेड करावी. व आपल्या शेतजमिनीवरील बँकेचा बोजा कमी करुन घेण्याबाबत श्री. जाधवर यांनी आवाहन केले आहे.
00000
No comments:
Post a Comment