जळगाव,
दि. 28 - विविध कारणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुंटूंबियांना आर्थिक
मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या समितीपुढे एकूण 20
प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी 14 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून 6 प्रकरणे
नामंजूर करण्यात आली आहे.
या
बैठकीस पोलीस उप अधिक्षक (मुख्यालय) रशीद तडवी, चिटणीस मंदार कुलकर्णी, कृषि विकास
अधिकारी मधुकर चौधरी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी वसंत महाजन, शेतकरी प्रतिनिधी
रोहिदास पाटील, नायब तहसीलदार अशोक लाडवंजारी आदि उपस्थित होते.
या
बैठकीत अभिमन किसन पाटील, राजवड, ता. पारोळा, शलिक हामु जाधव, दळवेल तांडा, ता.
पारोळा, जिभाऊ जयराम पाटील, करमाड बु. ता. पारोळा, तुकाराम चिंतामण पाटील, करमाड,
ता. पारोळा,नरेंर्द रमेश पाटील, भातखेडा, ता. एरंडोल, दत्तात्रय उमता सोमवंशी,
बाळद बु. ता. पाचोरा, कैलास श्रीराम पाटील, भवरखेडा बु. ता. धरणगाव, संतोष
आत्माराम पाटील, धुपे बु. ता. चोपडा, गोकुळ वामन शिरसाठ, हातेड खु. ता. चोपडा,
रामेश्वर हरिश्चंद्र खंडागळे, चिंचखेडा त. वा. ता. जामनेर, सुनिल पांडूरंग खवडे,
नवीदाभाडी, ता. जामनेर, सुभाष दशरथ पाटील, हिरापुर, ता. पारोळा, रमेश नामदेव
गायकवाड, वाकडी, ता. जामनेर, देवबा ओंकार पाटील, शिंदी, ता. भुसावळ या
शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना शासन नियमान्वये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
000
No comments:
Post a Comment