जळगाव, दि. 9 :- जिल्हयातील रेतीचे लिलाव करतांना पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. लिलाव करताना पर्यावरणाची हाणी होणार नाही याची दक्षता यंत्रणेने घ्यावी. असे निर्देश महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मार्फत
कार्यकारी परिषदेची आढावा बैठक पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी
कार्यालयात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार ए. टी. नाना
पाटील, आमदार श्रीमती स्मिताताई वाघ,
आमदार चंदुलाल पटेल, आमदार किशोर पाटील, आमदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे,
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
कौस्तुभ दिवेगावकर, जळगावचे उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी
राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील आदि उपस्थित होते.
वाळु उत्खननामुळे होणारी पर्यावरणाची
हाणी, नदीपात्रातील सर्व ठिकाणांचे लिलाव करणे, वाळू चोरी रोखणेसाठी उपाय योजना
करणे, नदीपात्रात वाळू गाळणी करुन देणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत
भांडे पाटील यांनी जिल्ह्यातील रेती लिलावाच्या ठिकाणांबाबत तसेच लिलावातून
मिळणाऱ्या महसुलाविषयी माहिती दिली.
000
No comments:
Post a Comment