जळगाव दि. 27 - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांचेवतीने
बाल विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये
पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना
वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण व्हावी. यासाठी
बालकल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांमधील मुले व इतर मुले यांचेसाठी बाल
महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाल महोत्सव-2017 चे उद्घाटन उपजिल्हाधिकारी
(महसूल) अभिजित भांडे पाटील यांच्या हस्ते जिल्हा क्रिडा संकुल, जळगाव येथे भारत
मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी अभिजीत भांडे पाटील व प्रा. श्रीमती वृषाली
कोल्हे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाल कल्याण समितीच्या
अध्यक्षा प्रा. श्रीमती वृषाली कोल्हे, डॉ. नीरज देव, डॉ. प्रा. वाय. जी. महाजन,
श्रीमती माया काळे, क्रिडा शिक्षक प्रविण पाटील, इकबाल मिर्झा, राहुल पाटील, मयूर
पाटील, नितीन विसपुते आदि उपस्थित होते.
जिल्हास्तरावर सुरु असलेल्या या महोत्सवात मुलांसाठी
विविध खेळ, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.
या बाल महोत्सवात विभागाच्या संस्थांमधील बालके तसेच इतर शाळांमधील बालके असे
सहाशे बालके सहभागी झाले होते. हा महोत्सव 27 ते 29 नोव्हेबर दरम्यान सुरु राहणार
आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी रमेश काटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस. आर. पाटील, जिल्हा
परिवीक्षा अधिकारी, जळगाव यांनी तर उपस्थितांचे आभार श्रीमती सारिका मेतकर,
परिवीक्षा अधिकारी यांनी मानले.
याप्रसंगी कार्यालयातील श्री. गजानन देशमुख, सहाय्यक
लेखाधिकारी, परिवीक्षा अधिकारी श्रीमती जयश्री पाटील, संरक्षण अधिकारी, श्रीमती
आरती साळुंखे व इतर सर्व कर्मचारी, शाळेचे शिक्षक श्री. अक्षय सोनवणे, प्रितेश
पाटील, साजीद शेख, आशिष पाटील, इरफान तडवी, सुप्रिया पाटील व महिला व बाल विकास
क्षेत्रातील संस्थांचे अधिक्षक, अधिकारी, कर्मचारी इतर मान्यवर उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment