जळगाव, दि.20 -
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2017-18 मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यात
राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेत सर्व अधिसुचित पिकांकरिता
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत 1 जानेवारी 2018 अशी आहे.
शेतक-यांना
योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) यांचेमार्फत
विमा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील
शेतकऱ्यांनी सर्व अधिसुचित पिकांकरिता 1 जानेवारी 2018 पुर्वी नजिकचे बँक व आपले
सरकार सेवा केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत. योजनेत
सहभाग घेण्यासाठी नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,
उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या
बँक, आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा. असे
आवाहन कृषि व फलोत्पादन मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment