जळगाव, दि 15 - गिरणा पाटबंधारे विभाग,
जळगाव अंतर्गत गिरणा प्रकल्पावरील पांझण डावा कालवा, जामदा डावा कालवा, जामदा उजवा
कालवा व निम्नगिरणा कालव्याद्वारे, कालवाप्रवाही, कालवाउपसा जलाशयउपसा,
लाभक्षेत्रातील, अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरुन पाण्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभधारकांना रब्बी हंगाम 2017-18 मध्ये 15
ऑक्टोबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 या मुदतीत गहू, हरभरा, ज्वारी, दादर, मका,
कडवळ, कपाशी, सुर्यफुल, करडई, भाजीपाला इत्यादी हंगामी पिकांना सिंचनासाठी
पाणीपुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
तरी लाभधारकांनी पाणी अर्जावर मागणी करुन
पाणी अर्ज 30 नोव्हेंबर 2017 च्या आत संबधीत पाटशाखेच्या कार्यालयात कार्यालयीन
वेळेत प्रत्यक्ष अगर पोष्टाने द्यावे. असे आवाहन उप कार्यकारी अभियंता, गिरणा
पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment