जळगाव, दि. 18 - डिजीटल युगात ग्रंथाचे महत्व कमी झाले नसून डिजिटल लायब्ररी, ई लायब्ररीमुळे त्यात वाढ होवून वाचनसंस्कृती वृध्दींगत झाल्याचे मत डॉ. अनिल चिकाटे यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय
संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव यांच्या
संयुक्त विद्ममाने सरस्वती हॉल (लेवा बोर्डिंग) येथे जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2017
चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सावाच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या
परिसंवादात डिजिटल युगात ग्रंथांचे महत्व या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात
आले होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिल चिकाटे हे होते. तर शेखर पाटील
यांनी सहभाग घेतला.
या
परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना डॉ. चिकाटे म्हणाले की, वाचन ही जीवनाला
आनंद देणारी बाब आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या पध्दतीने आपल्या आवडीच्या
विषयाचे वाचन करीत असतो. डिजिटलायझेशनच्या जमान्यात जुन्या पुस्तकांचे
डिजिटलायझेशन करण्यात येऊन ती वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच डिजिटल
लायब्ररी, ई लायब्ररी सारखे प्रकार सुरु झाले आहे. त्यामुळे वाचकांना आपल्या हातात
हवी ती पुस्तके उपलब्ध होत असल्याने वाचनात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. डिजिटल
क्रांतीमुळे ग्रंथाचे महत्व कमी न होता ते वेगळया स्वरुपात वाचले जात असल्याने वाचन
संस्कृती वाढली आहे.
श्री.
शेखर पाटील म्हणाले की, सोशल मिडीयाच्या वापरामुळे ग्रंथाचे महत्व कमी झाले नसून
वाचक ग्रंथालयात न जाता किंवा पुस्तक घेऊन न वाचता मोबाईल स्क्रीनवर वाचन करतात.
असे असले तरी ज्या पुस्तकांमध्ये जीवन जगण्याचा सार, चांगले विचार असतात अशा पुस्तकांना
आजही मागणी असून वाचक ते आवर्जून विकत घेऊन वाचतात. एवढेच नाहीतर आपल्या शहरातही
जागतिक किर्तीच्या लेखकांच्या पुस्तकाला आजही मागणी आहे. त्यामुळे ग्रंथाचे महत्व कधीही कमी होणार नसल्याचेही
त्यांनी सांगितले.
या
कार्याक्रमास समितीचे सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा
प्रकाशक संघटनेचे प्रतिनिधी युवराज माळी, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनिल
अत्रे यांचेसह जिल्हयातील ग्रंथालयांचे
ग्रंथपाल, नागरीक, विद्यार्थी, शाळा, महाविद्यालयाचे शिक्षक मोठया संख्येने
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी
मानले.
यावेळी ग्रंथोत्सवाच्या
समारोपानिमित्त जिल्हयातील आदर्श ग्रंथपालांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात
आला. या परिसंवादनानंतर जळगाव येथील दोन दिवशीय
ग्रथोत्सवाचा समारोप करण्यात आला.
000
No comments:
Post a Comment