जळगाव, दि. 18 - जीवन हेच एक संघर्ष आहे. त्यामुळे संघर्ष करा, आव्हाने स्वीकारा. हरलो तरी जिंकण्याची धमक ठेवल्यास यश निश्चित आहे. असा सूर आज जळगाव जिल्हा ग्रंथोत्सावाच्या निमित्ताने लेवा बोर्डींग येथे आयोजित ‘स्पर्धा परीक्षा एक आव्हान’ या परिसंवादातून उमटला.
राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्ममाने सरस्वती हॉल (लेवा बोर्डिंग) येथे जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सावाच्या दुसऱ्या दिवशी 'स्पर्धा परीक्षा एक आव्हान' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात प्रा. जयेंद्र लेकुरवाळे व प्रा. यजुर्वेद महाजन यांनी सहभाग घेतला. परिसंवादाच्या सुरुवातीस सहभागी वक्त्यांचे ग्रंथोत्सव समितीचे सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या परिसंवादात सहभागी होतांना प्रा. जयेंद्र लेकुरवाळे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा कोणी, का आणि कशी द्यायची हे अगोदर निश्चित केले पाहिजे. त्यासाठी कोणती पुस्तके वाचायला पाहिजे ते अगोदर समजून घ्या आणि नंतर तयारी करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक लेखकांचे संदर्भ पुस्तक असतात. परंतु त्या जोडीला शासकीय पुस्तकांचे संदर्भ आवश्यक असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासाबरोबरच सभोवतालचे वातावरण चांगले असणे आवश्यक असते. तसेच वाचनसंस्कृतीही महत्वाची आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयात शिक्षणासोबतच मुलांना आयुष्यात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचेही शिक्षण देण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर पालकांनी मुलांच्या आवडीस प्राधान्य दिले पाहिजे. त्यांची आवड शोधा, ती जोपासा, त्याचे ध्येय काय आहे त्या ध्येयाची परिकल्पना निश्चित करा. त्यांना मार्गक्रमण करायला लावा. यामुळे दुर्लक्षित मुलेही आपली वेगळी ओळख निर्माण करतात. मुलांना अतिसुरक्षा देण्याच्या नादात पालक त्यांच्यातील संघर्ष संपवित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आपण जेव्हा आयुष्यात संघर्ष करु तेव्हाच आपली वाटचाल यशस्वीतेकडे सुरु होत असल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रा. यजुर्वेद महाजन म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी मुलांची जडणघडण व्यवस्थित होणे आवश्यक आहे. मुलांना त्यांचे निर्णय घेवू द्या. मुलांनी शिक्षण घेत असताना अभ्यासिक पुस्तकांबरोबरच अवांतर वाचनास महत्व द्यावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी दृढता, प्रकाश आणि दिशा महत्वाची असते. त्यानुसार मुलांना आवडेल, रुचेल व पचेल असे साहित्य निर्माण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. चांगल्या सवयी संथगतीने तर वाईट सवयी झटपट लागत असतात. या वृत्तीने स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी संयम ठेवून आपले काम सुरु ठेवावे. एकच गोष्ट सातत्याने करीत राहिल्यास त्याची आवड निर्माण होते तीच चिरकाल टिकते. स्वत:चा स्वत:वर अढळ विश्वास असणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
एकदंरीत स्पर्धा परीक्षा हे आव्हान न मानता कितीही अवघड प्रश्न आला तरी तो समजून, उमजून घेतल्यास काहीही अवघड नसल्याचा सूर या परिसंवादाच्या निमित्ताने उपस्थितांमधून निघाला. या परिसंवादात माधुरी पाटील, डॉ. प्रकाश पाटील, प्रा. चंद्रकांत ठोंबरे, प्रा. मराठे, मुख्याध्यापक किरण बडगुजर आदिंनी वक्त्यांना आपल्या मनातील प्रश्न विचारुन शंकाचे निरसन करुन घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी मानले.
या परिसंवादास स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच शाळा, महाविद्यालयाचे प्राध्यापक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
0000
राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्ममाने सरस्वती हॉल (लेवा बोर्डिंग) येथे जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सावाच्या दुसऱ्या दिवशी 'स्पर्धा परीक्षा एक आव्हान' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात प्रा. जयेंद्र लेकुरवाळे व प्रा. यजुर्वेद महाजन यांनी सहभाग घेतला. परिसंवादाच्या सुरुवातीस सहभागी वक्त्यांचे ग्रंथोत्सव समितीचे सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या परिसंवादात सहभागी होतांना प्रा. जयेंद्र लेकुरवाळे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा कोणी, का आणि कशी द्यायची हे अगोदर निश्चित केले पाहिजे. त्यासाठी कोणती पुस्तके वाचायला पाहिजे ते अगोदर समजून घ्या आणि नंतर तयारी करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक लेखकांचे संदर्भ पुस्तक असतात. परंतु त्या जोडीला शासकीय पुस्तकांचे संदर्भ आवश्यक असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासाबरोबरच सभोवतालचे वातावरण चांगले असणे आवश्यक असते. तसेच वाचनसंस्कृतीही महत्वाची आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयात शिक्षणासोबतच मुलांना आयुष्यात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचेही शिक्षण देण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर पालकांनी मुलांच्या आवडीस प्राधान्य दिले पाहिजे. त्यांची आवड शोधा, ती जोपासा, त्याचे ध्येय काय आहे त्या ध्येयाची परिकल्पना निश्चित करा. त्यांना मार्गक्रमण करायला लावा. यामुळे दुर्लक्षित मुलेही आपली वेगळी ओळख निर्माण करतात. मुलांना अतिसुरक्षा देण्याच्या नादात पालक त्यांच्यातील संघर्ष संपवित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आपण जेव्हा आयुष्यात संघर्ष करु तेव्हाच आपली वाटचाल यशस्वीतेकडे सुरु होत असल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रा. यजुर्वेद महाजन म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी मुलांची जडणघडण व्यवस्थित होणे आवश्यक आहे. मुलांना त्यांचे निर्णय घेवू द्या. मुलांनी शिक्षण घेत असताना अभ्यासिक पुस्तकांबरोबरच अवांतर वाचनास महत्व द्यावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी दृढता, प्रकाश आणि दिशा महत्वाची असते. त्यानुसार मुलांना आवडेल, रुचेल व पचेल असे साहित्य निर्माण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. चांगल्या सवयी संथगतीने तर वाईट सवयी झटपट लागत असतात. या वृत्तीने स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी संयम ठेवून आपले काम सुरु ठेवावे. एकच गोष्ट सातत्याने करीत राहिल्यास त्याची आवड निर्माण होते तीच चिरकाल टिकते. स्वत:चा स्वत:वर अढळ विश्वास असणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
एकदंरीत स्पर्धा परीक्षा हे आव्हान न मानता कितीही अवघड प्रश्न आला तरी तो समजून, उमजून घेतल्यास काहीही अवघड नसल्याचा सूर या परिसंवादाच्या निमित्ताने उपस्थितांमधून निघाला. या परिसंवादात माधुरी पाटील, डॉ. प्रकाश पाटील, प्रा. चंद्रकांत ठोंबरे, प्रा. मराठे, मुख्याध्यापक किरण बडगुजर आदिंनी वक्त्यांना आपल्या मनातील प्रश्न विचारुन शंकाचे निरसन करुन घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी मानले.
या परिसंवादास स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच शाळा, महाविद्यालयाचे प्राध्यापक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment