Wednesday, 15 November 2017

रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन



          जळगाव, दि. 15-  कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन योजनांमधील पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागातदारांसाठी रब्बी हंगाम 2017-18 मध्ये भुसार, अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर हंगामी पिकांना उपलब्धतेनुसार पाणी देण्यात येणार आहे.
           त्यासाठी बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ) 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 31 डिसेंबर, 2017 पर्यंत सादर करावेत. पाणी अर्ज स्विकारण्याच्या अटी व शर्ती नियमानुसार राहतील. असे कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी कळविले आहे.
०००००

No comments:

Post a Comment