Monday, 27 November 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन



       जळगाव दि. 27 - शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी  आपले अर्ज 31 डिसेंबर, 2017 पावेतो वसतीगृहाचे गृहपाल अथवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांचेकडे करावे. असे आवाहन खुशाल गायकवाड, सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी केले आहे.
 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दहावीनंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचीत जाती व नवबौध्द विद्यार्थ्याना भोजन निवास व इतर सुविधा उपलब्ध करुन देणेसाठी शासनातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.
            शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळलेल्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना 50 टक्के गुण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी महानगरपालिका, नगरपालिका, एमएमआरडीए, एनआयटी यासारख्या प्राधिकरणाच्या हद्दीपासून 20 कि. मी. परीसरात असलेल्या महाविद्यालयात शिकत असलेला विद्यार्थी या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहे.
            या योजनेच्या लाभासाठी पात्र असणा-या विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर, 2017 पावेतो अर्ज सादर करण्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment