Tuesday, 8 January 2019

कांदा उत्पादक शेतक-यांनी अनुदानासाठी 15 जानेवारीपूर्वी संपर्क साधण्याचे आवाहन

            जळगाव,दि.८:- जिल्ह्यातील  कांदा उत्पादक शेतकरी यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, सहकार पणन व वस्त्रोदयोग विभाग,  महाराष्ट्र राज्य यांच्याकडील २६ डिसेंबर, २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील ज्या शेतक-यांनी माहे १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेला आहे. अशा
         शेतक-यांना प्रति क्विंटल २०० रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्यास अनुदान देण्याबाबतचा निर्णय जाहिर झालेला आहे.
        तरी  जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये या कालावधीत ज्या शेतक-यांनी कांदा विक्री केलेला आहे. त्यांनी शासन निर्णयाचा लाभ घेण्यासाठी दिनांक १५ जानेवारी, २०१९ पुर्वी कांदा विक्री पट्टी, ७/१२ उतारा, आपले बॅक बचत खाते क्रमांक सह बाजार समितीकडे उपलब्ध अर्ज भरुन ज्या बाजार समितीकडे कांदा विक्री केलेला आहे तेथे सादर करावा. असे आवाहन मेघराज राठोड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        000

No comments:

Post a Comment