जळगाव, दि. 24 - दरवर्षी 26 जानेवारी,
1 मे व 15 ऑगस्ट रोजी तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व नागरीकांकडून मोठ्या
प्रमाणावर छोट्या कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो.
कार्यक्रम संपल्यानंतर फाटलेले, खराब झालेले राष्ट्रध्वज रस्त्यावर,
कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले आढळतात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान
होतो. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी राष्ट्रध्वजाच्या वापराबाबतच्या
तरतुदींचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन राहूल मुंडके, अपर जिल्हादंडाधिकारी,
जळगाव यांनी केले आहे.
राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला
जाणे आवश्यक असून जाणीवपूर्वक जर राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे,
बोधचिन्ह व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 व राष्ट्रीय अवमान कायदा
1971 तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदींनुसार दंडनीय अपराध आहे.
प्लास्टीकचे विखुरलेले राष्ट्रध्वज
बरेच दिवस नष्ट होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रप्रतिष्ठेच्या
दृष्टिने ही बाब अतिशय गंभीर अशी आहे. तरी ध्वजसंहितेनुसार तसेच केंद्र शासनाकडील
गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरीता प्लास्टकीच्या
वापराबाबत मान्यता नसल्याचे श्री. मुंडके, अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी कळविले
आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर
राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, केबल वाहिन्या व
प्रसार माध्यमे यांनी जनजागृती करावी. तसेच खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज
विद्यार्थी, युवक मंडळे, क्रिडा मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गोळा करुन
त्याची ध्वजसंहितेमधील तरतूदीनुसार विल्हेवाट लावण्याचे आवाहनही श्री. मुंडके, अपर
जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment